७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांची कोरोना पडताळणी पूर्ण करून टप्प्याटप्प्याने शाळा चालू करण्याचा निर्णय ! – जिल्हाधिकारी दौलत देसाई

२३ नोव्हेंबरपासून शाळा चालू करणे बंधनकारक नाही.

(म्हणे) ‘धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद कोरोनापेक्षाही गंभीर !’  

हिंदु कट्टरतावादी असते, तर हा देश केव्हाच ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झाला असता, इस्लामी देशाप्रमाणे अल्पसंख्यांकांना हद्दपार केले असते, ते तसे नसल्यामुळे श्रीराममंदिर, श्रीकृष्णजन्मभूमी आणि ज्ञानवापी मशीद यांसाठी वैध मार्गाने लढा देत आहेत !

हसनपूर (कर्नाटक) येथील प्राचीन मंदिरातील श्री महाकालीदेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

हे मंदिर वर्ष १११३ मध्ये बांधण्यात आले आहे. ही घटना २० नोव्हेंबर या दिवशी उघड झाली, जेव्हा भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

बेंगळुरूमध्ये २ मशिदींवरील ध्वनीक्षेपकांद्वारे होणारे ध्वनीप्रदूषण थांबवण्यास हिंदु विधीज्ञ परिषदेच्या प्रयत्नांना यश

ध्वनीप्रदूषण करणार्‍या अशा ध्वनीक्षेपकांवर सरकारने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !

बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यास ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करू ! – भाजपच्या बंगालमधील खासदार लॉकेट चटर्जी

भाजपने केंद्रात त्याचे सरकार असल्याने संपूर्ण देशासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते. त्यासमवेत धर्मांतरविरोधी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदाही बनवून जुनी मागणीही तात्काळ पूर्ण करावी !

वैद्यकीय उपचार करतांना अध्यात्मशास्त्र अंतर्भूत केल्यास रोगाचे निदान आणि उपचार अधिक प्रभावीपणे करणे शक्य ! – डॉ. (सौ.) ज्योती खोदनापूर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वैद्यकीय क्षेत्रात अध्यात्मशास्त्र अंतर्भूत करणे’ या विषयावर ‘वेबिनार’

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘सूर्योपासने’विषयीचे संशोधन सादर

सूर्योपासनेविषयीचे अध्यात्मशास्त्र वैज्ञानिक भाषेत समजावून सांगण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने यासंबंधी केलेले आध्यात्मिक संशोधन सांगणारा व्हिडिओ सादर करण्यात आला. हे संशोधन ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) हे वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म-परीक्षण यांच्या साहाय्याने करण्यात आले.

आय.ए.एस् अधिकारी दांपत्य टिना डाबी आणि अथर खान यांचा घटस्फोटासाठी अर्ज

हिंदु महासभेने ‘लव्ह जिहाद’ म्हणून आरोप केलेल्या आय.ए.एस्. अधिकारी टिना डाबी आणि अथर खान यांच्या विवाहाच्या २ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोटासाठी येथील कुटुंब न्यायालयात अर्ज केला आहे. घटस्फोटामागील कारण समजू शकलेले नाही.

उत्तर भारतात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा बंधने  !

देशात कोरोनाच्या संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मध्य आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांत संपूर्ण दळणवळण बंदी नसली, तरी अनेक बंधने घोषित करण्यात आली आहेत.

कार्तिकी यात्रेला नियम पाळत अनुमती द्यावी !

आगामी कार्तिकी यात्रेला शासनाने सर्व नियम पाळत अनुमती द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांसह आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.