Govt Announces “Cashless Treatment” : रस्ते अपघातातील घायाळांवर विनामूल्य उपचार ; सरकार दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च उचलणार !

रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांना या महिन्यापासून, म्हणजेच मार्च २०२५ पासून दीड लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचार मिळतील. खासगी रुग्णालयांसाठीही हा नियम अनिवार्य असेल. ही प्रणाली देशभरात लागू केली जाईल.

Schools ‘Undesirable’: विद्यार्थ्यांना शाळेत भ्रमणभाष संच आणण्यास बंदी नाही ! – देहली उच्च न्यायालय

सध्या तंत्रज्ञान शिक्षणाचा एक आवश्यक भाग बनले आहे. भ्रमणभाषद्वारे मुले त्यांच्या पालकांशी जोडलेली रहातात, ज्यामुळे त्यांची सुरक्षिततादेखील सुनिश्चित होते.

पलूस येथील केदार वेताळ याच्या संघाचा रोव्हर यशस्वी !

गोवा येथील ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस’ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रोव्हर सिद्ध करण्याच्या स्पर्धेत पलूस येथील कु. केदार प्रदीप वेताळ याने महत्त्वाची भूमिका बजावलेल्या संघाने मंगळ ग्रहावर चालणारा आणि भूमी, हवामान यांचा अंदाज घेणारा रोव्हर सिद्ध करून स्पर्धा जिंकली.

पुणेकरांचे पाणीकपातीचे संकट टळले !

२ मार्च २०२५ या दिवशी जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला ७१४ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने नोटीस बजावली होती. थकबाकी न दिल्यास २५ फेब्रुवारीपासून पाण्यात कपात करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाने सांगितले होते.

Digital Lost and Found System : महाकुंभात हरवलेल्या ५४ सहस्र ३५७ भाविकांचे त्यांच्या प्रियजनांशी पुनर्मिलन !

योगी आदित्यनाथ शासनाच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन ! ‘गंगानदी अस्वच्छ होती’, ‘कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या’, असे सांगून उत्तरप्रदेश शासनाला वेठीस धरणारे आता त्यांच्या या कामगिरीवर काहीच का बोलत नाहीत ?

टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या वतीने ‘पितांबरी प्रॉडक्ट्स’चे रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘डी.लिट्.’ पदवी !

टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या वतीने ‘पितांबरी प्रॉडक्ट्स’चे व्यवस्थापकीय संचालक तथा ज्येष्ठ उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, उद्योजिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी आणि ज्येष्ठ अभिनेते तथा मनोविकारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांना ‘डी.लिट्.’ (विद्यानिधी) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ (विवाह न करता एकत्र रहाणे) आणि उत्तराखंडचा ‘समान नागरी संहिता कायदा २०२४’ !

. . . या प्रावधानामुळे (तरतुदीमुळे) हिंदुद्वेष्टे अप्रसन्न झाले. या कायद्यात आडकाठी आणण्याची विरोधकांनी एकही संधी सोडली नाही. त्यामुळे या कायद्याला उत्तराखंड उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथे आव्हान दिले गेले नसते तरच नवल !

Tirupati Laddu Row: तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये रसायन मिसळल्याची आरोपी अपूर्व चावडा याची स्वीकृती

तिरुपती मंदिराच्या प्रसादाचा लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या गायीच्या तुपात प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी अपूर्व चावडा या आरोपीने चूक मान्य केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मागील ७ वर्षांत पीडितांना ९ कोटी १३ लाख रुपयांचे साहाय्य !

‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मागील ७ वर्षांत जिल्ह्यातील १ सहस्र १२६ पीडितांना ९ कोटी १३ लाख रुपयांचे साहाय्य शासनाकडून दिले आहे.

पुणे येथील बालभारती-पौड फाटा रस्ता विकासाचा मार्ग मोकळा !

महापालिकेने वाहतुकीचा प्रश्न आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. आवश्यकता भासल्यास पर्यावरण विभाग आणि वन विभाग यांची अनुमती घ्यावी, असा निकाल देत याचिका निकाली काढली.