२६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू !
२६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू झाले असून त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले आहे.
२६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू झाले असून त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले आहे.
मनोज जरांगे यांनी विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप केले. त्याची चौकशी झाली पाहिजे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची भाषा ही अतिशय चुकीची आहे.आंदोलनांच्या वेळी येणारे जेसीबी कुणाचे ? ते कोणत्या कारखान्यांतून येतात ? त्यांच्यामागे कोण आहे ? पैसा कुठून येतो ? याची विशेष अन्वेषण समिती नेमून अन्वेषण झाले पाहिजे.
आरक्षण टिकणार नसल्याची चर्चा दुर्दैवी असल्याचे मत
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच टिकणारे आरक्षण दिले होते. टिकणारे आरक्षण देणार्या देवेंद्रजींवर बिनबुडाचे आरोप करणे, हे आम्हाला मान्य नाही.
आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे निघालेल्या मनोज जरांगे यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईला प्रारंभ केला आहे. पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या सहकार्यांची धरपकड चालू झाली आहे. २५ फेब्रुवारीच्या रात्री पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकार्यांसह एकूण ५ लोकांना कह्यात घेतले आहे.
मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे एकेकाळचे साथीदार अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते. गेल्या ३ दिवसांपासून उभयतांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत.
मोठ्या संख्येने आलेल्या हरकतींवर मार्ग काढायला किमान एक मास लागेल. तोपर्यंत सर्वांनी संयम राखायला हवा.
भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या मागे ‘सिल्व्हर ओक’ आहे कि जालना जिल्ह्यातील भैया कुटुंब ? जरांगेंनी त्यांची नौटंकी बंद करावी.
मराठा समाजाला ‘ओबीसी’त आरक्षण देण्याच्या आग्रही मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात ‘रस्ता बंद’ आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांच्या या आंदोलनाला राज्यातील बहुतांश शहरांत संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.