आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशातून हिंदूंना पळवून लावण्याचे जिहादी षड्यंत्र ! – दीपेन मित्रा, बांगलादेश

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयाेजित ‘ऑनलाईन विशेष संवाद’ : ‘पुन्हा एकदा बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार ?’

मुंबई : बांगलादेशातील विद्यार्थ्यांचे आंदोलन हे बांगलादेशाच्या पंतप्रधान आणि तेथील सर्व हिंदूंना देशातून पळवून लावण्यासाठी रचलेले पूर्वनियोजित जिहादी षड्यंत्र आहे. हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणामागे पाकिस्तानी गुप्तचर संघटना (आय.एस्.आय.), चीन आणि अमेरिका यांचा हात आहे. हा बांगलादेशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही भारतीय शासनाला बांगलादेशातील हिंदूंना तातडीने वाचवण्याची विनंती करतो. आज बांगलादेशात २.५ कोटी हिंदु आहेत; मात्र ते सुरक्षित नाहीत. हिंदूंना कोणत्याही प्रकारे न्याय मिळत नाही. बांगलादेशी सरकार, नेते अथवा सैन्य यांच्याकडून हिंदूंना कोणत्याही प्रकारचे साहाय्य मिळत नाही. अन्य घटनांमध्ये मानवतेवर अत्याचार होतात; म्हणून संयुक्त राष्ट्रे, मानवाधिकार संघटना कितीतरी आरडाओरड करतात; पण बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होतात, तेव्हा त्यांच्या बाजूने कुणीच काही बोलत नाही; कारण त्यांच्यासाठी हिंदू ही माणसे नाहीत, असे आवाहन ढाका (बांगलादेश) येथील ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन बांगलादेश’ आणि ‘युरोपियन युनियन चॅप्टर’चे प्रधान सचिव श्री. दीपेन मित्रा यांनी केले आहे.

श्री. दीपेन मित्रा

ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की…’ या ‘ऑनलाईन विशेष संवादा’तील ‘पुन्हा एकदा बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार ?’, या विषयावर बोलत होते.

पहा, ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की…’

बांगलादेशातील हिंदूंना वाचवायचे असेल, तर भारताने ठोस आक्रमक भूमिका घ्यावी ! – प्रकाश दास, संस्थापक सचिव, पश्चिम बंगेर जन्य

श्री. प्रकाश दास

वर्ष १९७२ मध्ये ज्या इस्कॉन मंदिराने बांगलादेशातील लोकांना ६ महिने भोजन दिले. त्याच लोकांनी या आंदोलनात ते इस्कॉन मंदिर जाळले. वर्ष १९७१ मध्ये भारताने सैनिकी कारवाई करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या वेळी २५ लाख हिंदु मारले गेले आणि सहस्रो स्त्रियांवर अत्याचार झाले. आज तोच प्रकार चालू आहे. विद्यार्थी आंदोलन हा मुखवटा आहे. खरेतर हे आंदोलन म्हणजे जिहाद्यांचेच षड्यंत्र आहे.

बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळण्यासाठी भारताने आग्रही भूमिका घ्यायला पाहिजे. इस्रायल जसा देश आणि धर्म यांच्यासाठी लढत आहे, तसेच आपणही स्वरक्षणासाठी हाती शस्त्र घेणे आवश्यक आहे. भारताला बांगलादेशातील हिंदूंना वाचवायचे असेल, तर ठोस आक्रमक पाऊल उचलावे लागेल. ‘जग काय म्हणेल ?’, हा विचार सोडून ठोस कृती करणे आवश्यक आहे.

Sign Petition : बांग्लादेश के हिन्दुओं और मंदिरों की सुरक्षा के लिए भारत सरकार तुरंत कदम उठाए

(चित्रावर क्लिक करा)