सहस्रार्जुन महाराजांच्या आशीर्वादाने भारताला परत हिंदु राष्ट्र बनवण्याचा संकल्प करूया ! – चेतन गाडी, हिंदु जनजागृती समिती

आपण सर्व या महापुरुषाचे वंशज आहोत. आपणही आपल्यात क्षात्रतेज निर्माण करून हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देऊया.

गोव्यात सरकारी नोकरीसाठी आता १ – २ वर्षांचा अनुभव असणे सक्तीचे ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

नोकरीसाठी मंत्री आणि आमदार यांच्या दारासमोर रांगा लावाव्या लागणार नाहीत, तर कर्मचारी नोकरभरती आयोगाच्या माध्यमातून नोकरी मिळणार !

गोवा : डाव्या विचारसरणीच्या वक्त्यांचा भरणा असलेला डी.डी. कोसंबी विचार महोत्सव विरोधामुळे स्थगित

सरकारच्या या निर्णयाविषयी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो म्हणाले, ‘‘हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे.’’ महोत्सव स्थगित ठेवल्याने ‘दक्षिणायन अभियान’ या डाव्या विचारसरणीच्या प्रागतिक विचारवंतांनी सरकारवर टीका केली आहे.

विदेशात नोकरीचे आमीष दाखवून फसवणार्‍या बनावट दलालांवर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

हे दलाल करत असलेली कृती ही मानवी तस्करीच असल्याने त्यांच्या विरोधात तस्करीच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी तस्करी विरोधी तिसऱ्या राज्यस्तरीय परिषदेत दिली.

(म्हणे) ‘हिंदु शब्द विदेशी असून त्याचा अर्थ फारच घाणेरडा आहे !

‘जो हीन गुणांचा नाश करतो तो हिंदु’, असे भारतीय धर्मग्रंथांमध्ये ‘हिंदु’ शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. याचा अभ्यास सतीश जारकीहोळी यांनी केलेला नाही, हेच त्यांच्या विधानातून लक्षात येते !

अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे हलाल प्रमाणपत्र देणार्‍या इस्लामिक संस्थांकडून आतंकवाद्यांशी संबंधित संघटनांना अर्थपुरवठा !

भारतातील हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संघटनांविषयी प्रश्नचिन्ह ! ‘हलाल शो इंडिया’ला अनुमती देतांना, पोलीस आणि प्रशासन यांना गांभीर्याने विचार करावा लागणार !

दादर येथे हलालविरोधी बैठकीचे आयोजन !

मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ला विरोध करण्यासाठी येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट, समन्वयक श्री. बळवंत पाठक आणि श्री. प्रदीप ओक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बाणगंगेच्या महाआरतीचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा ! – प्रवीण कानविंदे, अध्यक्ष, गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट

काशी आणि वाराणसी येथे ज्या पद्धतीने असंख्य दिवे लावून गंगेची आरती केली जाते. त्याचप्रमाणे बाणगंगा येथे त्रिपुरा पौणिमेला (७ नोव्हेंबर) सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होणार आहे.

रत्नागिरी : ग्रामस्थांच्या विरोधामुळे ‘जनता दरबारात’ कोतवडे ग्रामदेवीच्या मंदिराजवळील ‘परमिट रूम’ ला प्रशासनाने अनुमती नाकारली !

‘ग्रामस्थांचा विरोध असेल, तर अनुमती देऊ शकत नाही’, प्रशासनाकडून दिलेल्या या निर्णयामुळे सर्व ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील जनता दरबारात करण्यात आले अनेक समस्यांचे निराकरण

या वेळी मंत्री सामंत यांनी शासकीय अधिकार्‍यांना सूचना देतांना म्हटले की, नागरिकांना जनता दरबारात येण्याची वेळ येता कामा नये. त्यांचे प्रश्‍न अगोदरच सोडवण्यात यावेत. कुणीही पूर्वग्रहदूषितपणे जनतेशी वागू नये.