शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचार्यांची आणि ट्रस्टची चौथी बैठकही निष्फळ !
मंदिरांचे सरकारीकरण का नको, हे दर्शवणारी घटना ! कर्मचार्यांनी संप करायला हे मंदिर आहे कि कारखाना ?
मंदिरांचे सरकारीकरण का नको, हे दर्शवणारी घटना ! कर्मचार्यांनी संप करायला हे मंदिर आहे कि कारखाना ?
श्रीकृष्ण, श्रीराम हे हिंदूंसाठी आदर्श आहेत. त्यांनी वास्तव्य केलेले प्रत्येक क्षेत्र, ठिकाण हे हिंदूंसाठी परमपवित्र आणि पूजनीय आहे. हा हिंदूंचा वैभवशाली, गौरवशाली इतिहास आहे. या स्थानांचे जतन, जोपासना आणि संरक्षण होणे, हे हिंदूंच्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासंदर्भातील प्रस्ताव ग्रामविकास विभागाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत आणला होता. या खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी ५ कोटी रुपयांचे प्रावधान सुचवले होते. मंत्रीमंडळाने त्यास मान्यता दिली.
जेजुरीच्या खंडोबा गडावर १३ डिसेंबर या दिवशी करवीर पिठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात सकाळी साडेअकरा वाजता गडामधील नवरात्र महालात श्री खंडोबा म्हाळसादेवींच्या मूर्ती आणून वेदमंत्राच्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली.
‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’ या गजरामध्ये ५ लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव पार पडला. या वेळी भाविकांकडून रथावर गुलाल-खोबर्याची उधळण करण्यात आली.
देहू, आळंदी आणि पंढरपूर या परिसरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्याधुनिक बसस्थानक बांधण्यात येतील. स्वयंचलित जिना (रॅम्प) असलेले वाहनतळ उभारण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
नृसिंह सरस्वती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, श्री दत्त महाराज यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरुद्वादशीला (१० नोव्हेंबर) श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या पादुकांच्या महापूजेला ५८९ वर्षे पूर्ण झाली.
श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर आणि सप्तश्रृंगीदेवी या तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्याला राज्यशासनाने मान्यता दिली आहे. यासाठी ५३१ कोटी रुपयांचे प्रावधान शासनाकडून करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी २२ जुलै या दिवशी मिलिंद शंभरकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. या वेळी कुमार आशीर्वाद म्हणाले की, माझा सोलापूर जिल्ह्याचा अभ्यास आहे. येथील समस्याही ठाऊक आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा विकास करण्यावर भर देऊ.
मध्यप्रदेश शासनाचा स्तुत्य उपक्रम ! कुणा कथित धर्मनिरपेक्षतावाद्याने या उपक्रमावरून ‘भगवेकरण’ चालू असल्याची ओरड केल्यास आश्चर्य वाटू नये !