ज्ञानवापीमध्ये शिवलिंग सापडलेल्या ठिकाणी वजू करण्याची अनुमती देता येणार नाही !

ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाजवळ वजू करण्याच्या मुसलमान पक्षाच्या मागणीला उत्तरप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध केला आहे.

धार्मिक स्थळाजवळील कार्यक्रमांतील कलाकारांना मानधन देणे, ही धर्मनिरपेक्षताच ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने उत्तरप्रदेश सरकारकडून श्रीरामनवमीनिमित्त राज्यातील मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांतील सहभागी कलाकारांना मानधन देण्याच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली.

रेशन दुकानांतून वितरित करण्यात येणारा तांदूळ खाण्यायोग्य आहे ! – अमोल पाठक, तहसीलदार, कुडाळ

‘फोर्टिफाइड’ तांदूळ हा नियमितचे तांदूळ आणि इतर पोषक पदार्थ एकत्र करून बनवला जातो. त्याचे पोषणमूल्य अधिक असून शारीरिक स्वास्थ्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. (व्हिडिओ पहा)

कर्नाटकच्या भाजप सरकारमधील मंत्र्याच्या विरोधात गुन्हा नोंद

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मुनिरत्ना यांनी कथित आक्षेपार्ह विधान केले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी बेंगळुरूतील आर्.आर्. पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.

तळगाव (मालवण जि. सिंधुदुर्ग) येथे होणार्‍या गावठी मद्याच्या अवैध विक्रीवर तात्काळ कारवाई करा !

नागरिकांनी मागण्या किंवा आंदोलने केल्यावरच प्रशासन कृती करणार असेल, तर जनतेने कर भरून असे प्रशासन पोसायचे कशाला ? असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?

पंतप्रधान मोदी यांनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही ! –  गुलाम नबी आझाद

मी अनेक सूत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध केला; पण त्यांनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही, असे मत काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले.

गोवा सरकार मराठी भाषेला शासकीय व्यवहारामध्ये डावलत असल्याचा आरोप

सर्व शासकीय व्यवहारात कोकणीबरोबर मराठीचा वापर करून कायद्याचा मान राखावा आणि मराठीला डावलून लोकांचा रोष ओढवून घेऊ नये – मराठी राजभाषा समिती

सिंधुदुर्ग : नरडवे धरण प्रकल्पाचे काम पोलीस बंदोबस्तात चालू केल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध

शेकडो ग्रामस्थांनी ठेकेदार आस्थापनाच्या कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. ‘प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रथम पूर्ण करा आणि त्यानंतरच कामाला प्रारंभ करा’, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

आसाम विधानसभेत गदारोळ : ३ आमदार निलंबित

राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कामकाज स्थगन प्रस्तावाच्या सूत्रावरून आसाम विधानसभेत गदारोळ झाला. सभापती विश्‍वजित डेमरी यांनी सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब केले.

हिंदू रस्त्यावर उतरले की, सर्वांना त्रास का होतो ? – संदीप देशपांडे, मनसे

हिंदू रस्त्यावर उतरले की, सर्वांना त्रास होतो आणि मुख्यत्वे साम्यवाद्यांना त्रास होतो. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आणि कलम ३७० हटवल्यानंतर शाहीनबागमध्ये मुसलमान १०० दिवसांहून अधिक काळ बसून राहिले, तेव्हा न्यायालयाला हे चुकीचे होत आहे, असे वाटले नाही का ?