‘घराबाहेर पडू नको’ असे सांगितल्यामुळे भावाची हत्या

देशात सर्वत्र दळणवळण बंदी (लॉकडाऊन) असतांना कांदिवली येथील राजेश हे त्यांच्या पत्नीसमवेत बाहेर जात होतेे. त्यावर त्यांच्या भावाने विरोध करून ‘अशामुळे त्यांच्या घरात कोरोना पसरेल’, असे सांगितले. राजेश यांना भावाने सांगितलेले न आवडल्याने त्यांनी भावाच्या डोक्यात तवा मारला.

‘घराबाहेर पडू नको’ असे सांगूनही न ऐकल्याने भावाची हत्या

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘दळणवळण बंदी’चे प्रकरण
आपत्काळात किती संयमाने वागणे आवश्यक आहे, हे या घटनेवरून लक्षात येईल !

‘सीएए’चे समर्थन करणार्‍या १५ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचे विधान करणारे धर्मांध प्राध्यापक निलंबित

येथील ‘जामिया मिलिया उस्मानिया विद्यापिठा’तील साहाय्यक प्राध्यापक अहमद अबरार यांनी ट्वीट करून नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (‘सीएए’चे) समर्थन करणार्‍या १५ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचे विधान केले होते. याची नोंद घेत विद्यापिठाच्या प्रशासनाने त्यांना निलंबित केले.

साम्यवाद्यांच्या केरळमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या सूचीत मद्याचा समावेश

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात ‘दळणवळण बंदी’ घोषित केली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. असे असतांना केरळ राज्यात मद्यविक्री चालू रहाणार आहे; कारण केरळमध्ये मद्यासह सर्व प्रकारचे पेय पदार्थ जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत अंतर्भूत…

‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी २ सहस्र लोकांना मेजवानी देणार्‍या इरफान सिद्दकी या काँग्रेस नेत्यावर गुन्हा नोंद

येथील अंबिकापूरमध्ये २२ मार्च या दिवशीच्या ‘जनता कर्फ्यू’च्या वेळी २ सहस्र लोकांना पंचतारांकित ‘ग्रँड बसंत’ या हॉटेलमध्ये मेजवानी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे नेते इरफान सिद्दकी आणि हॉटेलचे संचालक के.के. अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

कोरोना आणि बहुराष्ट्रीय आस्थापनांची ‘नफेखोरी’ची वृत्ती

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर काही आस्थापनांनी आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; पण तोपर्यंत ही आस्थापने चालूच ठेवण्यात आली होती.

प्रवासी हंगामात खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची केली जाणारी लूटमार तात्काळ थांबवावी !

उन्हाळी सुट्टी, तसेच लग्नसराई यांच्या निमित्ताने चालू होणार्‍या प्रवासी हंगामात खासगी वाहतूकदारांकडून प्रचंड भाडेवाढ करून प्रवाशांची लूटमार केली जाते. ही लूटमार रोखण्यासाठी शासनाच्या निर्णयात सुधारणा करून त्याची प्रवासी हंगाम चालू होण्यापूर्वी परिणामकारक आणि कठोर कार्यवाही करावी