दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कुवेतहून भारतात आलेल्या ३ आरोपींना जामीन !; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा नोंद !…

कुवेतमधून बोटीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना मुंबईतील न्यायालयाने जामीन संमत केला. आरोपीविरोधात संशयास्पद पुरावे किंवा आक्षेपार्ह आढळलेले नाही.

राज्य परिवहन महामंडळाची सांगलीहून कुंडल येथे जाणारी बस वाटेतच बंद पडली !

राज्य परिवहन महामंडळाची सांगलीतून कुंडल येथे जाणारी (एम्.एच्.१४ बी.टी. १०६६) या क्रमांकाची बस पाचवा मैल येथे आल्यावर नादुरुस्त झाल्याने ६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता बंद पडली.

एस्.टी. बससह चारचाकी गाड्यांवर दगडफेक करणार्‍या २ मुसलमानांना अटक !

या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अन्वेषण करून जाफर मंजूर सिनदी आणि सुबेध शमशुद्दीन मुजावर या दोन मुसलमानांना अटक केली आहे, तसेच एका अल्पवयीन मुलास कह्यात घेतले आहे.

राज्य परिवहन महामंडळातील ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील गतीदर्शक यंत्र बंद !

महाराष्ट्रात विविध गावांमधून धावणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील ‘स्पीडोमीटर’ (गतीदर्शक यंत्र) बंद आहे. त्यामुळे चालकांना गाड्यांची गती समजत नाही.

सांगली बसस्थानक परिसरात गाड्या लावण्यासाठी जागा मिळणार !

या आगारात ५०० हून अधिक गाड्यांची ये-जा असते. सांगली बसस्थानक जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे प्रवाशांची संख्या मोठी आहे.

सोलापूर बसस्थानकातून बार्शीला जाणार्‍या गाड्यांचा तुटवडा !

प्रवाशांची संख्या पाहून बसगाड्यांचे नियोजन का केले जात नाही ? नागरिकांची सोय पहाणारे प्रशासन हवे !

परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील तक्रार निवारण प्रणालीच्या दुरुस्तीचे पैसे अन्यत्र फिरवल्याचा आरोप !

हिंदु विधीज्ञ परिषदेचा परिवहन विभागावर गंभीर आरोप मुंबई, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आर्.टी.ओ.च्या) ‘https://transport.maharashtra.gov.in/1035/Home’  संकेतस्थळावरील तक्रार निवारण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी शासनाच्या आदेशाद्वारे संमत करण्यात आलेला ३७ लाख ७४ सहस्र ६५७ रुपयांचा निधी प्रत्यक्षात त्यासाठी वापरण्यात आलेला नाही. ‘अ‍ॅप’ दुरुस्तीच्या नावाखाली संमत करण्यात आलेला हा निधी प्रत्यक्षात मात्र अन्यत्र फिरवण्यात आल्याचा गंभीर आरोप हिंदु … Read more

#Exclusive : महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीच्या योजनांमुळे एस्.टी.ची भरभराट !

एस्.टी.च्या इतिहासात ‘महिला सन्मान योजना’ सर्वाधिक यशस्वी योजना ठरली आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेपेक्षाही अल्प कालावधीत महिला सन्मान योजनेने एस्.टी.ला सर्वाधिक आर्थिक लाभ प्राप्त करून दिला आहे.

Exclusive : खासगीकरण नव्हे, ‘एस्.टी.’ महाराष्ट्र शासनाचीच रहाणार !

एकेकाळी भरभराटीला असणारे ‘महाराष्ट्र राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळ’ अस्वच्छ बसस्थानके, भंगारात काढायच्या स्थितीला आलेल्या बसगाड्या आणि त्यात राजकीय अनास्थेमुळे अक्षरश: डबघाईला आले होते.

एस्.टी. बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स राखीव ठेवावेत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘स्वाधार योजने’च्या अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना सिद्ध करावी, तसेच राज्यातील एस्.टी.च्या सर्व बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स राखीव ठेवावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय अधिकार्‍यांना दिले.