कोल्हापूर – दीपावलीच्या निमित्ताने होणार्या संभाव्य गर्दीचा विचार करून राज्य परिवहन महामंडाळाच्या वतीने २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई, पुणे, ठाणे, परळ, सोलापूर, अक्कलकोट अशा मार्गांवर अधिक वाहतूक करण्यात येणार आहे. पुणे मार्गावर २७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत नियमित बसगाड्यांच्या व्यतिरिक्त २५० अधिक गाड्यांचे नियोजन, तसेच भाऊबीजेनिमित्तही अधिक गाड्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. दीपावली झाल्यावर परतीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले आहे. या फेर्या ‘ऑनलाईन’ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी प्रवाशांनी सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन मंडळांच्या बसगाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक शिवाजीराव जाधव यांनी केले आहे
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > दीपावलीनिमित्त एस्.टी.च्या कोल्हापूर विभागाच्या २५० अधिक फेर्या !
दीपावलीनिमित्त एस्.टी.च्या कोल्हापूर विभागाच्या २५० अधिक फेर्या !
नूतन लेख
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाळीव कुत्र्याची हत्या करणारा कह्यात ! ; कोंबड्यांच्या विष्ठेमुळे माशा वाढून विद्यार्थी आजारी !
- विमानातून ४ पक्ष्यांना आणणारे २ भारतीय प्रवासी अटकेत !
- टपाली मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सिद्ध !
- घुसखोरीच्या संदर्भात राजकीय पक्षांनी घोषणापत्रातून भूमिका व्यक्त करावी ! – सुरेश चव्हाणके, संपादक, ‘सुदर्शन’ टीव्ही
- अधिवक्ता दत्ता सणस ‘अखिल भारत हिंदु महासभे’चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष !
- मुंबईत ९ महिन्यांत ४८४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !