दीपावलीनिमित्त एस्.टी.च्या कोल्हापूर विभागाच्या २५० अधिक फेर्‍या !

कोल्हापूर – दीपावलीच्या निमित्ताने होणार्‍या संभाव्य गर्दीचा विचार करून राज्य परिवहन महामंडाळाच्या वतीने २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई, पुणे, ठाणे, परळ, सोलापूर, अक्कलकोट अशा मार्गांवर अधिक वाहतूक करण्यात येणार आहे. पुणे मार्गावर २७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत नियमित बसगाड्यांच्या व्यतिरिक्त २५० अधिक गाड्यांचे नियोजन, तसेच भाऊबीजेनिमित्तही अधिक गाड्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. दीपावली झाल्यावर परतीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले आहे. या फेर्‍या ‘ऑनलाईन’ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी प्रवाशांनी सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन मंडळांच्या बसगाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक शिवाजीराव जाधव यांनी केले आहे