स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्‍यात काही अडचण आहे का ?

सुदैवाने आताच्‍या सत्ताधार्‍यांना स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची थोरवी सर्वांत अधिक ठाऊक आहे. सत्तेवर येऊन १० वर्षे झाली, तरी सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्‍यात त्‍यांना अडचण काय आहे ?

#Exclusive : स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी साम्यवाद्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध ! – अनुपम मिश्रा, संपादक, दैनिक ‘प्रयागराज टाईम्स’, उत्तरप्रदेश

साम्यवाद्यांच्या ‘देशाला तोडा आणि राज्य करा’ या नीतीला सावरकर यांच्या प्रखर देशभक्तीमुळे धोका निर्माण झाला. येथूनच साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी सावरकर यांना विरोध चालू केला; कारण प्रश्‍न त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा होता.

#Exclusive : स्वा. सावरकरांनी  हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास अभ्यासणे आवश्यक ! – डॉ. एस्.आर्. लीला, संस्कृतच्या निवृत्त प्राध्यापिका

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास वाचल्याविना गतवैभव समजणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही इतिहास समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला वर्तमानही समजणार नाही.

‘शतपैलू सावरकर’ या Exclusive वृत्तमालिकेतील वृत्ते आणि व्हिडिओ पहा !

भारतातील विविध राज्यांतील सावरकर अभ्यासकांनी सावरकर यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या कार्यावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया प्रकाशित केल्या आहेत.

#Exclusive : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रखर राष्ट्रवादाचा विरोधकांना धोका वाटतो ! – उदय माहूरकर, केंद्रीय माहिती आयुक्त

‘काँग्रेसची मुसलमानांचे तुष्टीकरण करण्याची नीती चालू राहिली, तर भारताची फाळणी होऊ शकते. असे भाकीत सावरकरांनी वर्ष १९३७ मध्ये कर्णावती येथे वर्तवले होते.

#Exclusive : भाषाशुद्धीचे कार्य करणारे एकमेव क्रांतीकारक म्हणजे वीर सावरकर ! – अधिवक्ता सुशील अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे अभ्यासक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे भाषाशुद्धीसाठी कार्य केलेला अन्य कुणी क्रांतीकारक नसावा. त्यांनी भाषाशुद्धीसाठी केलेले प्रयत्न हे त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.

#Exclusive : भारतीय अर्थव्यवस्थेला सशक्त करण्यासाठी स्वदेशीचा अवलंब करावा लागेल ! – रोहित चक्रतीर्थ, कर्नाटक

आपली अर्थव्यवस्था सक्षम करणे आणि स्वदेशीचा अवलंब करून देश बळकट करणे या गोष्टी सद्यःस्थितीत आपण सावरकरांकडून शिकायला हव्या. हाच संदेश सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी करतांना दिला होता.

#Exclusive : हिंदूंमध्ये असलेली एकजूट मतदानाच्या वेळी दाखवता आली पाहिजे ! – सात्यकी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू

स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या पुढे नेण्यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘आपण सगळे हिंदू आहोत’, हे मनात ठसवायला हवे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी समाजात जाऊन ही जागृती करायला हवी.

#Exclusive : सावरकरांनी सांगितल्यानुसार हिंदूंनी जात-पात, प्रांत-भाषा विसरून एकत्र आल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

सावरकरांनी हिंदूंना एक संदेश दिला होता की, जर हिंदुस्थानला पुन्हा समर्थ आणि संपन्न बनवायचे असेल, तसेच सगळ्या अडचणींवर मात करायची असेल, तर हिंदूंनी जात-पात, प्रांत-भाषा हे सगळे विसरून एकत्र आले पाहिजे.

#Exclusive : हिंदु समाज क्षुद्र राजकारणात विभागला जाऊ नये, यासाठी हिंदूंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांमधील ‘हिंदूसंघटक’ हा गुण अंगीकारणे महत्त्वाचे ! – विद्याचरण पुरंदरे, इतिहास अभ्यासक, पुणे

‘या देशाने तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी लक्षात ठेवावे ?’, असा प्रश्न विचारल्यावर सावरकर उत्तरले, ‘‘मला या देशाने ‘हिंदूसंघटक’ म्हणून लक्षात ठेवावे, अशी माझी इच्छा आहे !’’