हवामान पालटाच्या विरोधात विकसित देश निष्क्रीय ! – भारताची रोखठोक भूमिका

आतापर्यंत विकसित देशांना त्यांच्या गैरकृत्यांवर विचारणारे कुणी नव्हते, किंबहुना तसे करण्यास अन्य कोणताही देश धजावत नसे. भारताच्या अशा भूमिकेमुळे विकसित देशांना चपराक बसत आहे !

पाकच्या सिंध प्रांतात मुसलमानांनी अल्पवयीन हिंदु मुलाला मारहाण करून केली हत्या !

हिंदूंसाठी असुरक्षित झालेले जिहादी पाकिस्तान ! हिंदूंच्या जिवावर उठणार्‍या अशा घटना वारंवार घडत असतांनाही भारत त्यासंदर्भात पाकला जाब का विचारत नाही ?

अमेरिकेच्या संसदेत श्री श्री रविशंकर आणि आचार्य लोकेश मुनी यांच्या शांततेच्या कार्याचे कौतुक !

श्री श्री रविशंकर गेल्या ४० वर्षांपासून ध्यान आणि योग यांच्या बळावर जगातील लोकांना आंतरिक शांतीसाठी मार्गदर्शन करत आहेत. जगातील एकतरी इस्लामी धर्मगुरु असे कार्य करतात का ?

कॅनडातील गुरुद्वारामध्ये लावण्यात आले आहेत भारतीय अधिकार्‍यांच्या हत्येसाठी चिथावणी देणारे फलक !

कॅनडामध्ये दुसरे पाकिस्तान झाले आहे, असेच यावरून लक्षात येते !

पाकच्या बलुचिस्तानमधील मशिदीजवळ झालेल्या भीषण बाँबस्फोटात ५४ जण ठार !

मस्तुंग येथे सकाळी साडेदहा वाजता झालेल्या भीषण बाँबस्फोटामध्ये आतापर्यंत ५४ जण ठार झाल्याचे आणि ३० हून अधिक जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. येथे मदिना मशिदीजवळ हा बाँबस्फोट झाला.

मणीपूर येथे आंदोलकांचे राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर आक्रमण !

राज्यातील हिंसाचार समाप्त करण्यासाठी मूलगामी उपाय न काढल्यानेच हिंसाचार पुन:पुन्हा डोके वर काढत आहे, हेच अशा घटनांतून म्हणता येईल !

पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांकडून भारताचा ‘शत्रू देश’ असा उल्लेख !

भारताने पाकच्या क्रिकेट संघाला देशात येण्याची अनुमती द्यायाला नको होती, हे यातून स्पष्ट होते ! खेळातही शत्रूत्व दाखवणार्‍या अशा देशावर भारताने बहिष्कार घातला पाहिजे ! जनतेने यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !

गुजरातमध्ये ८०० कोटी रुपयांचे कोकेन जप्त

पकडण्यात आलेले कोकेन इतके आहे, तर न पकडले गेलेले आणि समाजात विकण्यात येत असलेले कोकेन किती असेल ? याची कल्पना करता येत नाही !

पंजाबमध्ये अकाली दलाच्या नेत्याची हत्या

होशियारपूर येथून १५ किमी अंतरावर असणार्‍या मेगोवाल गंजियान या गावात शिरोमणी अकाली दलाचे नेते सुरजित सिंह आंखी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.

माझ्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रमाणपत्रासाठी साडेसहा लाख रुपयांची लाच द्यावी लागली ! – विशाल, तमिळ अभिनेते

‘हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या चित्रपटांना या मंडळाकडून प्रमाणपत्र दिले जाते आणि त्याला हिंदूंनी विरोध केल्यावर त्याची नोंदही घेतली जात नाही, त्या वेळीही अशीच लाच घेऊन हे चित्रपट संमत केले जातात का ?’, असा प्रश्‍न आता उपस्थित होतो !