(म्हणे) ‘म्हशी कापता येतात; मग गायी का नाही ?’ – के. व्यंकटेश, पशुसंवर्धन मंत्री

भारतातील प्रत्येक हिंदूला गायीचे महत्त्व ठाऊक आहे आणि गायीविषयीच्या भावनाही; मात्र व्यंकटेश जाणीवपूर्वक मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी असे विधान करत आहेत ! कर्नाटकमध्ये काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना त्यांची चूक लक्षात येईल का ?

मी समलैंगिक विवाहांच्या १०० टक्के विरोधात ! – सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ

मी समलैंगिक विवाहांच्या १०० टक्के विरोधात आहे, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी केले आहे. ‘लाईव्ह लॉ’ या वृत्तसंकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे.

मी परदेशात जाऊन राजकारण करत नाही ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

मी परदेशात जाऊन राजकारण करत नाही आणि यापुढेही करणार नाही, असे उत्तर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे एका तरुणाने विचारलेल्या प्रश्‍नाला दिले. या तरुणाने राहुल गांधी यांचे नाव न घेता ‘अमेरिकेतील काही लोक भारताविषयी वक्तव्ये करत आहेत.

ओडिशातील रेल्वे अपघात सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे झाल्याची प्राथमिक माहिती ! – रेल्वे बोर्ड

बालासोर येथील रेल्वे अपघाताविषयी रेल्वे बोर्डाकडून पत्रकार परिषद घेऊन विस्तृत माहिती देण्यात आली. बोर्डाच्या अधिकारी जया सिन्हा यांनी या वेळी सांगितले की, हा अपघात सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे झाला, अशी प्राथमिक माहिती आहे.

मणीपूरमध्ये हिंसाचार चालूच !

मणीपूरमध्ये गेल्या मासाभरापासून चालू असलेला हिंसाचार थांबलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍यानंतरही येथे हिंसाचार चालूच आहे. गेल्या २४ घंट्यांत मैतेई आणि कुकी या समाजांच्या गावांवर झालेल्या आक्रमणांत  अनेक लोक घायाळ झाले.

‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’मधील पालटांमुळे झाला ओडिशातील रेल्वे अपघात ! – अश्‍विनी वैष्णव, रेल्वेमंत्री

ओडिशातील बालासोर येथे २ जून या दिवशी झालेल्या रेल्वे अपघातामागील कारण समोर आले आहे. रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, या दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली असून अपघाताचे कारण स्पष्ट झाले आहे.

हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास सांगणार्‍या शाळेची मान्यता रहित !

मध्यप्रदेशचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील दमोह येथील ‘गंगा जमना हायर सेकेंडरी स्कूल’ या शाळेची मान्यता रहित केली आहे.

गोवा : ३ दिवसांच्या पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरात दिसणारे लोगो प्लास्टिक कचर्‍याच्या वापरावर लक्ष केंद्रित करण्याच्या कल्पनेने विकसित केले गेले आहेत आणि यामुळे लोकांना प्लास्टिक कचर्‍याचा चांगल्या प्रकारे वापर आपल्या दैनंदिन जीवनात कसा करू शकतो, याची प्रेरणा मिळते.

गोव्यात ‘होम स्टे’ योजनेला मोठ्या प्रमाणात वाव ! – पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री

गोवा सरकारने ‘गोवा स्टे’ योजनेला चालना देणारे धोरण आखले पाहिजे आणि यामुळे अधिक खर्च करण्याची क्षमता असलेले पर्यटक गोव्यात आकर्षिले जाऊ शकतात.

धर्मशिक्षणाच्या अभावी आत्मघात करून घेणारे हिंदू !

‘धर्मशिक्षणामुळे धर्मासाठी त्याग करण्यास लाखो मुसलमान सिद्ध असतात, तर हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते बुद्धीप्रामाण्यवादी होऊन धर्माला खोटे ठरवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले