ओडिशात भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९० हून अधिक !
भुवनेश्वर येथून चेन्नईला जाणार्या कोरोमंडल एक्सप्रेसला २ जूनला रात्री मोठा अपघात झाला.
भुवनेश्वर येथून चेन्नईला जाणार्या कोरोमंडल एक्सप्रेसला २ जूनला रात्री मोठा अपघात झाला.
२ एप्रिल या दिवशी कन्नूरला जाणार्या रेल्वेगाडीत एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. तिने प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ टाकून रेल्वेला आग लावली. यात ३ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण भाजले होते.
आसनगाव रेल्वे स्थानकाजवळील धावत्या लोकलमधून १६ फेब्रुवारीला अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. यामुळे भयभीत होऊन प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या, तर काहींनी साखळी ओढून लोकल थांबवली.
२८ नोव्हेंबर या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वेस्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत शिक्षिका नीलिमा रंगारी यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात १३ प्रवासी घायाळ झाले होते.
जिल्ह्यातील बल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा ‘प्री कास्ट स्लॅब’चा भाग तुटल्याने १३ प्रवासी रेल्वे रुळांवर कोसळले. या दुर्घटनेत शिक्षिका नीलिमा रंगारी (वय ४८ वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर इतर १२ जणांवर उपचार चालू आहेत.
राज्यातील जाजपूर जिल्ह्यात असलेल्या कोरेई रेल्वे स्थानकावर सकाळी पावणे सातच्या सुमारास एक मालगाडी रुळावरून घसरली आणि स्थानकातील प्रतिक्षालयामध्ये (‘वेटिंग रूम’मध्ये) घुसली.
अशा अपघातांनी भारताची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित योग्य उपाययोजना काढणे आवश्यक !
या अपघातामुळे ५६ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १२ रेल्वेगाड्या रहित करण्यात आल्या आहेत, तर इतर गाड्यांचा मार्ग वळवण्यात आला आहे. सध्या रेल्वेकडून बचावकार्य चालू आहे. रेल्वे मार्ग अद्याप पूर्ववत् झालेला नाही.
कल्याण येथे जलद डाऊन मार्गावरील रेल्वेच्या रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या २ ट्रॅकमन्सनी (रूळ दुरुस्त करणारे कर्मचारी) प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत लाल सिग्नल दाखवून एक्सप्रेस थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या जवळच्या वागळे गावाजवळ एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन वेगळे झाले. या घटनेत कुठलीही जीवित किंवा अनुचित घटना घडलेली नाही.