भाव-भक्तीचा वर्षाव करणारा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव’ फर्मागुडी (गोवा) येथे श्रीविष्णुमय वातावरणात साजरा !

प्रथमच अशा भव्य स्वरूपात साजर्‍या झालेल्या या ब्रह्मोत्सवाने सनातनच्या सर्वत्रच्या साधकांना कृतकृत्य केले. रथारूढ भगवान श्रीविष्णुची नृत्य, गायन आणि वादन यांद्वारे स्तुती करणे म्हणजेच ब्रह्मोत्सव ! तिरुपती बालाजीचा ब्रह्मोत्सव असाच साजरा होतो !

हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आवश्यक ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

गोमातेच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांचेच सरकार कायम !

उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यामुळेच राज्यातील सरकार कोसळल्यामुळे राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला न्यायालयाकडून मान्यता दर्शवण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निकाल – उद्धव ठाकरे

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्तेसाठी हपापलेल्या लोकांच्या राजकारणाची चिरफाड आहे. राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले आहे. यापुढे राज्यपाल ही यंत्रणा अस्तित्वात ठेवावी कि नाही, हे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडायला हवे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हा तर लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णपणे विजय झाला आहे, असे मी नमूद करू इच्छितो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

इम्रान खान यांची अटक अवैध असल्याने त्यांची सुटका करा ! – सर्वोच्च न्यायालय

३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने इम्रान खान यांची अटक अवैध असल्याचे सांगत हा आदेश दिला. ‘नॅशनल अकौंटेबिलिटी ब्युरो’ या विभागाने इम्रान खान यांना २ दिवसांपूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून बलपूर्वक अटक केली होती.

सुवर्ण मंदिराच्या परिसरात झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणात ५ जणांना अटक

सुवर्ण मंदिराच्या परिसरात एका आठवड्यात ३ स्फोट झाले. ६ मे या दिवशी सुवर्ण मंदिराच्या जवळ असलेल्या हॅरिटेज स्ट्रीटच्या परिसरात स्फोट २ स्फोट झाले. ८ मे या दिवशी तिसरा स्फोट झाला.

सरकारला माझा शिरच्छेद करायचा होता ! – पोप फ्रान्सिस यांचा अर्जेंटिना सरकारवर गंभीर आरोप

फ्रान्सिस यांनी हे आरोप २९ एप्रिल या दिवशी हंगेरी दौर्‍यावर असतांना जेसुइट्समध्ये बोलतांना केले आहे. जेसुईट्स हा रोमन कॅथॉलिक चर्चच्या व्रस्तस्थांचा एक संघ आहे. 

१० वर्षांनी भारत जागतिक महसत्ता असेल ! – योगऋषी रामदेवबाबा

योग हा राष्ट्रातच नव्हे, तर जगभरात जाईल आणि योगधर्मासमवेतच सनातन धर्माची प्रतिष्ठा संपूर्ण जगात वाढेल. माता-भगिनींना आवाहन करतो की, प्रतिकुल परिस्थितीत, आपत्ती किंवा गंभीर संकटात स्वधर्मापासून डगमगू नका, संयम ठेवा, योग आत्मसात करा, सर्व अडथळे दूर होतील.

चीनकडून कैलास मानसरोवर यात्रेचे शुल्क दुप्पट !

हा चीनचा हिंदुद्वेष असून सरकारने तात्काळ याचा निषेध करून हे वाढीव शुल्क रहित करण्यासाठी चीनवर दबाव आणला पाहिजे !