
नवी देहली – पुढील १० वर्षांनी भारत संपूर्ण जगाची सर्वांत मोठी आर्थिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सर्वांत मोठी सामरिक महासत्ता असेल, असे विधान योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केले. योगऋषी रामदेवबाबा यांच्या नेतृत्वाखाली आणि पतंजलि विद्यापीठ, भारत स्वाभिमान (महिला शाखा) आणि डब्ल्यू -२०, जी-२० च्या भागीदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये महिलांची विशाल परिषद आयोजित करण्यात आली होती. यात विविध राज्यांतील अनुमाने ५ सहस्र ५०० महिला सहभागी झाल्या होत्या. त्या वेळी योगऋषी रामदेवबाबा बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘योग हा राष्ट्रातच नव्हे, तर जगभरात जाईल आणि योगधर्मासमवेतच सनातन धर्माची प्रतिष्ठा संपूर्ण जगात वाढेल. माता-भगिनींना आवाहन करतो की, प्रतिकुल परिस्थितीत, आपत्ती किंवा गंभीर संकटात स्वधर्मापासून डगमगू नका, संयम ठेवा, योग आत्मसात करा, सर्व अडथळे दूर होतील.’’
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा