पाकला नष्‍ट केल्‍यावरच या घटना थांबतील !

राजौरी (जम्‍मू-काश्‍मीर) येथे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्‍यात झालेल्‍या चकमकीत ५ सैनिक वीरगतीला प्राप्‍त झालेे. चकमकीच्‍या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर बाँब फेकले.

सर्वांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्यास वर्ष २०४७ मध्ये भारत विश्वगुरुपदी विराजमान होईल ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप

त्याग, सर्वस्व समर्पण म्हणजे हिंदु धर्म ! हिंदु धर्म अनादी काळापासून जोडण्याचे काम करत आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना प्रत्येक भारतियाच्या कायम मनात आहे. सध्या सगळीकडे वाचन अल्प होत आहे. सर्वत्र ‘डिजिटलायझेशन’ झाले आहे, असे सांगितले जात आहे; परंतु ते चुकीचे आहे.

शरद पवार यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदाची धुरा पुन्‍हा स्‍वत:कडे घेतली !

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या राष्‍ट्रीय अध्‍यक्षपदावरून निवृत्त होत असल्‍याची घोषणा करणार्‍या शरद पवार यांनी त्‍यांचा निर्णय मागे घेत पुन्‍हा या पदाची धुरा स्‍वत:कडे घेतली आहे.

सीमा शुल्क विभागाने पकडलेल्या जहाजावरील साडेतीन सहस्र शेळ्या-मेढ्यांपैकी ३०० शेळ्यांचा मृत्यू

बहुतांशी शेळ्या-मेंढ्यांची उपासमार झाली होती. त्यात समुद्रातील प्रवासामुळे अनेक  शेळ्या अशक्त बनल्या होत्या. जहाजाची क्षमता ८०० ते १ सहस्र मेंढ्यांची असतांना साडेतीन हजार शेळया-मेंढ्यांची वाहतूक करण्यात आली होती.

आंदोलन पुन्हा जोर धरणार या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ११ जणांना केली अटक

प्रकल्प विरोधकांचा विरोध अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. अशातच ६ मे या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू येथील ग्रामस्थांना भेटणार आहेत.

लोटे (खेड) येथील अरोमा इंटरमिडिएट्समध्ये भीषण आग

रिॲक्टरमधील रसायनाने अचानक पेट घेतल्याने आस्थापनाच्या काही भागास भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने कुणी घायाळ झालेले नसले, तरी आस्थापनाची आर्थिक हानी झाली आहे.

चिपळूण येथे मध्यवर्ती बसस्थानकामध्ये उन्हाळा न्यून होईपर्यंत केली थंडगार पाण्याची व्यवस्था

हा  उपक्रम हा पर्यावरणपूरक असून कागदी ग्लासमधून या पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच विद्यार्थीही स्वतःच्या बाटलीमधूनही हे पाणी भरून घेऊ शकतील, अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे.

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील दानपेटीचा लिलाव बंद केल्यापासून मंदिराच्या उत्पन्नात मोठी वाढ !

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील दानपेट्यांच्या लिलावाची पद्धत बंद झाल्यापासून मागील १३ वर्षांत मंदिरातील रोख रक्कम आणि सोने-चांदी यांच्या स्वरूपातील उत्पन्न १० पटींनी वाढले आहे.

‘द केरल स्टोरी’ चित्रपट आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, या देशाचा दुर्दैव आहे की, समाजाला उद्ध्वस्त करणार्‍या आतंकवादी प्रवृत्तींच्या पाठीशी काँग्रेस उभी राहिलेली दिसत आहे. हे लोक ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.