महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल इंधनांवरील कर अल्प करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल इंधनांवरील कर अल्प केला, तशाच प्रकारचा निर्णय आता महाराष्ट्रात घेतला जाईल. पेट्रोल आणि डिझेल या इंधनांवरील कर लवकरच अल्प करण्यात येणार आहे

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन !

पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी आळंदी येथून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ४ जुलै या दिवशी सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांचे ठाणे नगरीत जोरदार स्वागत !

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ४ जुलै या दिवशी प्रथमच ठाणे येथे आले. ठाणे येथील समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाणे जिल्ह्याला ‘मुख्यमंत्रीपद’ मिळाल्याने ठाणेकरांनी आनंद व्यक्त केला.

आम्ही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवू ! – गुलाबराव पाटील, आमदार

शिवसेना रसातळाला जात असतांना तिला वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. शिवसेना संपत असेल, तर ती वाचवण्याचे दायित्व आमचे आहे. असे प्रतिपादन एकनाथ शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर देतांना केले.

न्याय : सोयीचा आणि विरोधाचा !

‘जे धर्माच्या नावाखाली नेहमीच देशाच्या हिताच्या विरोधात उभे रहातात अशांवर कायदा आणि सुव्यवस्था या कारणामुळे कारवाई करण्यास सरकारही घाबरते. त्यामुळे ही मानसिकता पुढे कायम रहाणार, असेच दिसून येते. तरी सरकारने अशा मानसिकतेवर कडक उतारा शोधण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हे डोईजड होणार, हे नक्की !

मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी २० दिवस शैक्षणिक साहित्यापासून वंचित !

यामागील कारणांचा शोध घेऊन महापालिकेने विद्यार्थ्यांना त्वरित साहित्य उपलब्ध करून द्यावे आणि ते न देणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाईही करावी !

कोल्हापूर हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा बंदीवान फरार !

हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आणि अभिवचन रजेवर (फर्लोवर) बाहेर पडलेला बंदीवान रवि म्हेत्रे फरार झाला आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाकडून धारावी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

घुसखोरांना देशाबाहेर हाकला !

गुरुग्रामजवळ (हरियाणा) असलेल्या मानेसर गावात आयोजित पंचायतीने जवळपासच्या सर्व गावांमधील हिंदूंना घुसखोर मुसलमान व्यापारी आणि विक्रेते यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

धरण म्हणजे नदीसह शेकडो प्रजातींचे मरण आणि महापुराला आमंत्रण !

ज्या पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करून आपण नद्या संपवत आहोत, आता त्याच पाश्चात्त्यांचे योग्य अनुकरण करून नद्यांना वाहू दिले पाहिजे !

हिंदूंच्या दुर्दशेचे कारण म्हणजे शतकांपासून शुद्ध राष्ट्रवादी, दूरदर्शी, झुंजार आणि प्रभावी नेतृत्व यांचा अभाव !

आमची अशी कोणती हतबलता आहे की, जी आम्हाला स्वतःविषयी घृणा आणि शत्रुत्व राखणाऱ्या मानसिकतेचा विरोध न करता मानवतेच्या रक्षणार्थ आवश्यक कृती करण्यात संकोच निर्माण करते ? आमची पराभूत वृत्ती झाली आहे का ?’