पुनश्‍च हरि ॐ !

‘हिंदु राष्ट्र’ हीच भारत आणि नेपाळ दोघांचीही सनातन ओळख आहे. आज नेपाळमधील जनतेने त्याची मागणी तीव्र करत नेली आहे आणि येत्या काळात त्याची तीव्रता वाढणार आहे. भारत आशियातील महत्त्वाचे राष्ट्र असल्याने या जनतेला भारताकडून मिळणारा पाठिंबा हा पुष्कळ साहाय्याचा ठरणार आहे. भारताकडून तो मिळेल, अशी अपेक्षा आहे.

आंदोलकांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शेळ-मेळावली येथे जाणार नाहीत ! – सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शेळ-मेळावली येथे नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या ग्रामस्थांना भेटण्यासाठी जाणार नाहीत, अशी माहिती भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांना दिली.

‘रामराज्य’ अर्थात् ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी श्रीरामभक्तांकडून ट्विटरवर ट्रेंडद्वारे संकल्प

श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामंमदिर बांधण्याची वाट मोकळी झाली आणि तेथे मंदिराच्या उभारणीसाठी भूमीपूजनही करण्यात आले; मात्र हिंदूंनी श्रीराममंदिर उभारण्यापर्यंत सीमित न रहाता प्रभु श्रीरामाला अपेक्षित असे ‘रामराज्य’ आणण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक आहे.

आज गोवा विधानसभेत विधीमंडळ दिन : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित रहाणार

गोवामुक्तीच्या ६० व्या वर्षानिमित्त गोवा विधानसभा संकुलात ९ जानेवारीला दुपारी ४ वाजल्यापासून विधीमंडळ दिन साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाला भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे वायूप्रदूषणामुळे प्रतिवर्षी ३ लाख ५० सहस्र गर्भपात !

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांत मोठ्या प्रमाणात होणार्‍या वायुप्रदूषणामुळे प्रतिवर्षी ३ लाख ४९ सहस्र ६८१ गर्भपात होतात, असे लँसेट हेल्थ जर्नलच्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.

आपत्काळात तरून जाण्यासाठी भक्त होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सध्या आपत्काळास प्रारंभ झाला आहे. या आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताची भक्ती करणे आवश्यक आहे. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून शुद्ध मनाने भक्ती म्हणजेच साधना केली पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या परिसरामध्ये २०० एकर जागेत भीषण आग

तालुक्यातील माडबन परिसरातील प्रस्तावित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या भडकलेल्या आगीमध्ये २०० एकर जागेतील गवत जळून खाक झाले आहे.

धर्माचा अधिकार जगण्याच्या अधिकारापेक्षा मोठा नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

काही नियमावलींचे पालन करायला सांगून आता देशभरातील मंदिरे भक्तांसाठी उघडली जात आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात काही नियम आणि अटी घालून प्राचीन श्रीरंगम् मंदिरातील उत्सव चालू करण्यासाठी तमिळनाडूतील अण्णाद्रमुक सरकारने प्रयत्न करायला हवेत.

फोंडा पोलीस ठाण्यात धर्मांधाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार नोंद

पिळये, धारबांदोडा येथील एक अल्पवयीन मुलगी गायब झाल्यासंबंधीची तक्रार ७ जानेवारी या दिवशी फोंडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आरोपी आणि गायब झालेली मुलगी यांचा पोलीस शोध घेत असून अजून त्याविषयी काही माहिती मिळालेली नाही.

केंद्र सरकार गायीच्या उपयुक्ततेची माहिती देण्यासाठी प्रथमच राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेणार !

गायीचे दूध, गोमूत्र, शेण आदी गोष्टी मानवाला अत्यंत उपयुक्त आहेत; मात्र गायीचे कित्येक उपयोग आपल्याला आजही ठाऊक नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आता ‘राष्ट्रीय कामधेनू आयोगा’कडून राष्ट्रीय पातळीवर एक परीक्षा घेतली जाणार आहे.