
राजापूर – तालुक्यातील माडबन परिसरातील प्रस्तावित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या भडकलेल्या आगीमध्ये २०० एकर जागेतील गवत जळून खाक झाले आहे.
७ जानेवारीला रात्री साडेआठच्या सुमारास ही आग अधिक भडकली होती. वार्यासमवेत भडकलेल्या आगीचे लोण जैतापूर प्रकल्प परिसरातील गावांमध्ये पसरले होते. ही आग विझवण्यासाठी राजापूर येथील अग्नीशमन बंबाला बोलावण्यात आले. काही ग्रामस्थांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. दोन घंट्यांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. ही आग नेमकी कशी लागली ? हे स्पष्ट झाले नसले, तरी ‘शॉर्टसर्किट’ने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री