Shivaji Maharaj : शिवरायांच्या काळातील समुद्री सामर्थ्य आपल्याला परत मिळवायचे आहे ! – पंतप्रधान मोदी

एखाद्या देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचे असते, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत प्रथम जाणले. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. ‘समुद्रावर ज्याचे वर्चस्व तो सर्वशक्तीमान’ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले.

Defence Deal : केंद्र सरकारकडून २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला मान्यता !

केंद्रशासनाने भारतीय सैन्यदलाला आणखी बळकट करण्यासाठी २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला स्वीकृती दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील ‘संरक्षण अधिग्रहण परिषदे’ने हा निर्णय घेतला.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर केली शस्त्रांची पूजा !

यामुळे भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना पोटशूळ उठल्यास नवल नाही !

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सहकार्य करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांचे आश्वासन ! –  मुख्यमंत्री

गोव्यात ३७ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत होणार आहेत. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासह गोव्यात विविध उपक्रम राबवणे, यांसाठी केंद्र सरकार गोवा सरकारला सर्वतोपरी पाठिंबा देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

लडाखमध्ये भारतीय सैन्याचे वाहन खोल दरीत कोसळून ९ सैनिकांचा मृत्यू

मृत सैनिकांमध्ये एका अधिकार्‍याचाही समावेश आहे. काही सैनिक घायाळही झाले आहेत. भारतीय सैनिक कारू गॅरिसन येथून लेहजवळील क्यारी शहराकडे जात होते. त्या वेळी ही घटना घडली.

भारत आपल्या सन्मानासाठी नियंत्रणरेषाही ओलांडू शकतो ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पाकिस्तान आणि चीन यांच्या भारतविरोधी कारवाया पहाता सैनिकांनी नियंत्रणरेषा ओलांडण्याची हीच योग्य वेळ आहे, असेच भारतियांना वाटते !

मणीपूरच्या प्रकरणावरून संसदेचे कामकाज काही वेळासाठी स्थगित !

सरकार चर्चेस सिद्ध असतांनाही विरोधी पक्षांकडून गदारोळ ! यावरून विरोधी पक्षांना मणीपूरच्या घटनेविषयी सुख-दुःख नाही, तर त्यांना यावरून  राजकारण करून सरकारला जाणीवपूर्वक वेठीस धरायचे आहेत, असेच दिसून येते !

पाकव्याप्त काश्मीरमधील लोकच हा भाग भारतात विलीन करण्याची मागणी करतील ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. येथील जनताही भारतात येऊ इच्छित आहे. भारताच्या संसदेने पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे.

‘नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी’ आता ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ नावाने ओळखली जाणार !

केंद्रशासनाने देहलीतील ‘नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी’चे नाव पालटून आता ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ असे ठेवले आहे. माजी पंतप्रधान नेहरू यांचा या ठिकाणी १६ वर्षे निवास होते. त्यांच्या निधनानंतर येथे संग्रहालय करण्यात आले होते.

संरक्षण क्षेत्रात स्‍वयंपूर्णतेचे पाऊल !

केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रासाठी प्रत्‍येक वेळी आर्थिक तरतूद वाढवत असून वर्ष २०१९-२० मध्‍ये ५८ टक्‍के, वर्ष २०२१-२२ मध्‍ये ६४ टक्‍के, तर २०२२-२३ मध्‍ये ६८ टक्‍के इतक्‍या मोठ्या प्रमाणात रक्‍कम स्‍वदेशी गुंतवणुकीसाठी राखीव ठेवली.