पुरातन मंदिरांचे जतन हे महत्त्वाचे कार्य ! – डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य

केवळ आर्थिक प्राप्तीसाठी नवीन मंदिरे उभारण्यापेक्षा मोठी परंपरा असलेल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन करणे, हे मोठे कार्य असल्याचे प्रतिपादन मन्मथधाम संस्थान, कपिलधार येथील सद्गुरु डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य यांनी केले.

गोवा विद्यापिठातील प्रश्‍नपत्रिका चोरी प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध आगशी पोलीस ठाण्यात तक्रार

शिक्षण क्षेत्रात असे प्राध्यापक असतील, तर भावी पिढी काय घडणार ? आणि देश महासत्तेकडे तरी कशी वाटचाल करणार ?

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेले रासायनिक लेपन करण्यात येऊ नये !

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरेतर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले.

सद्गुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

आज काही कीर्तनकार ओंगळवाणे प्रदर्शन करत कीर्तन करतात आणि वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे, असे परखड मत ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी व्यक्त केले.

पावणे ३ कोटी रुपयांच्या मद्याची पोलिसांकडून विल्हेवाट

मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून कारवाई केली जाते. या कारवाईच्या वेळी कह्यात घेतलेल्या मद्याची न्यायालयाच्या आदेशानंतर विल्हेवाट लावली जाते.

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी भाजपकडून तिघे रिंगणात !

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १० ते १७ मार्च अर्ज भरणे, १८ मार्च अर्जांची पडताळणी, २० मार्च अर्ज मागे घेण्याचा दिवस आणि २७ मार्च या दिवशी मतदान होईल.

आपत्कालीनप्रसंगी रुग्णांवर तातडीने उपचारासाठी आरोग्य क्षेत्रात ‘हेलिकॉप्टर’ सेवेची आवश्यकता ! – विश्वजीत राणे

डिचोली येथे १६ मार्च या दिवशी आयोजित केलेल्या एका मोठ्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

राष्ट्रीय काँग्रेसच्या युवकांची पदयात्रा पुण्यातच रोखली !

प्रदेश सरचिटणीस जैन म्हणाले, ‘‘अनुमती नाकारायची होती, तर आम्ही ३-४ दिवसांपूर्वी अनुमती मागितली, तेव्हाच नकार द्यायचा होता. आता अनुमती नाकारणे म्हणजे पोलिसांची ही हुकूमशाही आहे.

सांगली येथे छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास पाळणार्‍या २ विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शाळेतून हाकलले

ज्या शाळेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा बलीदान मास पाळणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षा दिली जाते, अशा शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांना घालायचे का ? ते ठरवावे.

डोंबिवलीत २ गटांत हाणामारी : पोलिसांवर आक्रमण !

पोलिसांवर आक्रमण होणे, हे आता नित्याचेच झाले आहे; पण यामुळे पोलीस खात्याला कलंक लागतो त्याचे काय ?