इचलकरंजीत मुसलमान विद्यार्थ्यांच्या पोषाखास हिंदु विद्यार्थ्यांकडून भगवी पट्टी घालून प्रत्युत्तर

कोल्हापूर शहरातील एका महाविद्यालयात भगवी पट्टी घालणार्‍या विद्यार्थ्यास वर्गाबाहेर काढल्याची घटना ताजी असतांनाच इचलकरंजी येथेही या प्रकाराची पुनरावृत्ती झाली.

पुण्यात पडकलेल्या २ धर्मांध आतंकवाद्यांचा बाँबस्फोट करण्याचा डाव उधळला !

यापूर्वी १० जुलै २०१४ या दिवशी शहराच्या मध्यभागातील फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकीत स्फोटके ठेवून स्फोट घडवण्यात आल्याची घटना घडली होती. याविषयी एन्.आय.ए., ए.टी.एस्., तसेच पुणे पोलीस यांकडून आतंकवाद्यांची चौकशी करण्यात येत आहे.

संभाव्य आपत्तीत स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सिद्ध ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

संभाव्य आपत्ती व्यवस्थापन नियोजनाच्या अनुषंगाने स्थानिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी शिराळा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने सतर्क रहावे. पावसाचा वाढता जोर पहाता स्थानिकांनीही याविषयी तात्काळ माहिती द्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे.

पंढरपूर येथील कोट्यवधींचा खर्च करून बांधलेल्या तुळशी वृंदावनातील संतांच्या मंदिरांचे चौथरे निकृष्ट दर्जाचे !

तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा आणि संत एकनाथ महाराज यांचे मंदिर कोसळल्याच्या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात फळपीक विम्याची साडेचौदा सहस्र बोगस प्रकरणे !

सोलापूर जिल्ह्यात एकूण ४ सहस्र ४१३ विमा अर्जदारांपैकी २ सहस्र ७१३ बोगस विमा प्रकरणे, तर जळगाव जिल्ह्यात एकूण ७८ सहस्र ४३० विमा अर्जदारांपैकी १९ सहस्र ९७२ अर्जांची पडताळणी झाली असून १ सहस्र १४५ बोगस विमा प्रकरणे आढळून आली आहेत.

शासकीय, तसेच खासगी रक्तपेढ्यांतील रक्ताच्या दरात वाढ !

शासकीय रक्तपेढ्यांतून विकत मिळणार्‍या प्रतियुनिट रक्ताकरता पूर्वी ८५० रुपये द्यावे लागायचे. ते यापुढे १ सहस्र १०० रुपये देऊन विकत घ्यावे लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घरे, पूल, रस्ते, डोंगर खचल्याने हानी 

जिल्ह्यात गेले ३ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेती, बागायती यांसह खासगी आणि शासकीय संपत्तीची हानी झाली आहे.

इरशाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू !

इरशाळवाडी येथे परिसरात दुर्गंधी येत आहे. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी रहातील ! – रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या गटाने सत्तेमध्ये प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला आहे. यामुळे मुख्यमंत्री पालटण्यात येण्याविषयी सर्वत्र चर्चा चालू झाली आहे.

नवी मुंबईत आर्.टी.ई.च्या प्रतीक्षा सूचीतील ११७ विद्यार्थ्यांच्या पालकांनी लवकर प्रवेश घ्यावा ! – अरुणा यादव, शिक्षणाधिकारी

बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये प्रतीवर्षीप्रमाणे खासगी विनाअनुदानित शाळेत एकूण पटाच्या २५ टक्के विद्यार्थांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. त्यामध्ये अर्जांवरून पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केले आहेत.