श्रीराम, श्रीकृष्ण, तसेच भगवद्गीता, महाभारत, रामायण आणि गोमाता यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला पाहिजे !

अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा धार्मिक स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने भारतात ईशनिंदा किंवा कठोर कायदा नसल्याने गुन्हेगारांना कठोर शिक्षा देता येत नाही. यातूनच मोठ्या प्रमाणात हिंदु देवतांचा अवमान होईल, अशा पद्धतीने विज्ञापने दिली जातात.

आझाद मैदान दंगलीतील आरोपींकडून ९ वर्षांनंतरही हानीभरपाई वसूली नाही ! – दंडाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांची माहिती

सध्या हे सर्व ६० आरोपी जामिनावर आहेत. पोलीस आणि प्रशासन यांची हतबलता, शासनकर्त्यांची उदासीनता यांमुळे हे सर्व गुन्हेगार अद्यापही मोकाट आहेत !

किल्ले विशाळगड येथे न बांधलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ‘२५१५ योजनेतून बांधलेला रस्ता’ असे लिहिलेल्या फलकाचे अन्वेषण करून दोषींवर कारवाई करा !

हिंदु विधीज्ञ परिषदेची सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांकडे तक्रार

तुळजापूर आणि शनिशिंगणापूर या देवस्थानांकडे सरकार ५ वर्षे फिरकलेच नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

एकीकडे शासनाला स्वत:चे उद्योग धड चालवता येत नसल्यामुळे ते विकावे लागत आहेत. मग कोणत्या तोंडाने सरकार ‘आम्ही मंदिरांचे व्यवस्थापन करू’, असे म्हणते ?

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी साम्यवाद आणि भांडवलशाही यांपेक्षा धर्माधिष्ठित अर्थशास्त्र अंगीकारणे आवश्यक !

समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी धर्माधिष्ठित अर्थशास्त्र आवश्यक !

किल्ले पन्हाळा येथे पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे पन्हाळा येथे निवेदन

किल्ले पन्हाळा या वास्तूकडे दुर्लक्ष होत असून गेल्या २ – ३ वर्षांपासून पावसाळ्यात रस्ते खचण्याचे प्रकार, अतिक्रमण आदींमुळे दुर्गप्रमी आणि शिवभक्त यांच्यामध्ये अप्रसन्नता आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अकार्यक्षम अधिकारी आणि सांगलीतील दोषी संस्था यांच्यावर कारवाई करा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

सांगलीतील ‘सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी’ या संस्थेकडून प्रदूषणाच्या नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे प्रकरण

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींचे निर्माते आणि विक्रेते यांच्यावर फौजदारी कारवाई करावी !

या निवेदनामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने पुरोगामी लोकांना प्रसन्न करण्यासाठी ३ मे या दिवशी कागदी लगद्यापासून गणपती मूर्ती बनवण्यास एका अध्यादेशाने अनुमती दिली.

कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींचे निर्माते आणि विक्रेते यांच्यावर फौजदारी कारवाई करावी !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचे संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना निवेदन

वैद्यकीय क्षेत्रातील Cut-Practice वर शरसंधान : असाहाय्य रुग्णांना लुबाडणारी रुग्णालये आणि डॉक्टर्स यांची ‘सर्जरी’ केव्हा ?

या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न !