…. पण ‘पैशाचा हिशेब देऊ’, असे कुणी म्हणत नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदू विधीज्ञ परिषद

यांच्या धाडी पडल्यानंतर ‘यामागे राजकीय डाव आहे’, ‘ही छळवणूक चालली आहे’, ‘यामागे घाणेरडे राजकारण आहे’, आदी विविध प्रतिक्रिया दिल्या जातात !

मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – धाडी पडल्यानंतर ‘यामागे राजकीय डाव आहे’, ‘ही छळवणूक चालली आहे’, ‘यामागे घाणेरडे राजकारण आहे’, आदी विविध प्रतिक्रिया दिल्या जातात; परंतु ‘आमच्याकडे असलेल्या पैशांचा हिशेब देऊ’, असे उत्तर मात्र मी तरी पाहिलेले नाही, असे मार्मिक परंतु वस्तुस्थिती दर्शवणारे ‘ट्वीट’ हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी २३ मार्च या दिवशी केले आहे.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

 

विविध आर्थिक अपहाराच्या प्रकरणांत केंद्रीय स्तरावरील अंमलबजावणी संचनालय, आयकर विभाग, तर राज्यस्तरावरील आर्थिक अन्वेषण गुन्हे अन्वेषण यंत्रणा आदी यंत्रणाकडून टाकण्यात येत असलेल्या धाडी आणि त्यांवर सत्ताधारी अन् विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत असलेल्या प्रतिक्रिया यांविषयी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी वरील टिपणी केली आहे.

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दोन्हीकडून दोन्हीकडे धाडी टाकाव्यात. जप्तीची कारवाई करावी. अनधिकृत बांधकामे पाडून टाकावीत. मजुरापासून ते साखरेपर्यंत सगळ्यांचे सहकाराचे कारभार बाहेर आणावेत. अजून काही करायचे असेल, तर तेही करून टाकावे. त्यानिमित्त काळा पैसा तरी बाहेर येईल. कोण किती कसे खात होते, कुणाचे हात कुठे पोचले होते ? कुणाचे लागेबांधे कसे आहेत ? हे लोकांना पुन्हा पुन्हा स्पष्ट होत राहील.