
मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – धाडी पडल्यानंतर ‘यामागे राजकीय डाव आहे’, ‘ही छळवणूक चालली आहे’, ‘यामागे घाणेरडे राजकारण आहे’, आदी विविध प्रतिक्रिया दिल्या जातात; परंतु ‘आमच्याकडे असलेल्या पैशांचा हिशेब देऊ’, असे उत्तर मात्र मी तरी पाहिलेले नाही, असे मार्मिक परंतु वस्तुस्थिती दर्शवणारे ‘ट्वीट’ हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी २३ मार्च या दिवशी केले आहे.

— Ichalkaranjikar V.S. (@ssvirendra) March 23, 2022
विविध आर्थिक अपहाराच्या प्रकरणांत केंद्रीय स्तरावरील अंमलबजावणी संचनालय, आयकर विभाग, तर राज्यस्तरावरील आर्थिक अन्वेषण गुन्हे अन्वेषण यंत्रणा आदी यंत्रणाकडून टाकण्यात येत असलेल्या धाडी आणि त्यांवर सत्ताधारी अन् विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत असलेल्या प्रतिक्रिया यांविषयी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी वरील टिपणी केली आहे.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दोन्हीकडून दोन्हीकडे धाडी टाकाव्यात. जप्तीची कारवाई करावी. अनधिकृत बांधकामे पाडून टाकावीत. मजुरापासून ते साखरेपर्यंत सगळ्यांचे सहकाराचे कारभार बाहेर आणावेत. अजून काही करायचे असेल, तर तेही करून टाकावे. त्यानिमित्त काळा पैसा तरी बाहेर येईल. कोण किती कसे खात होते, कुणाचे हात कुठे पोचले होते ? कुणाचे लागेबांधे कसे आहेत ? हे लोकांना पुन्हा पुन्हा स्पष्ट होत राहील.
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !