औरंगाबादच्या नामांतराविषयी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील ! – खासदार संजय राऊत, शिवसेना
औरंगाबादच्या नामांतराषियी महाविकास आघाडीत मतभेद नाहीत.
औरंगाबादच्या नामांतराषियी महाविकास आघाडीत मतभेद नाहीत.
शासनाकडून बचतगटांना काम दिले जाते तसेच त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो, असे असतांना भ्रष्टाचार करून बचतगटाच्या मूळ संकल्पनेलाच सुरूंग लावणार्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने येथील गोळीबार मैदानावर (फायरिंग बट) गोळीबार सराव करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात लोकांनी जाऊ नये, तसेच प्राणी आदींनाही नेऊ नये.
उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू ९ जानेवारी या दिवशी गोवा विधानसभेच्या ‘विधीमंडळ दिवस’ कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी गोव्यात येत आहेत.
अखिल गोवा व्यापारी संघटनेच्या म्हापसा येथील सत्यहिरा सभागृहात ३ जानेवारी या दिवशी झालेल्या बैठकीत ‘गोवा पालिका दुरुस्ती अध्यादेश २०२०’ या शासनाने काढलेल्या वटहुकूमाला विरोध दर्शवला आहे.
स्थानिकांचा विरोध असला, तरी शासन शेळ-मेळावली, सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.
जिल्ह्यातील गड आणि किल्ले यांवर पोलीस गस्त वाढवण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा बसला.
आंध्रप्रदेश भारतात नाही, तर पाकिस्तानमध्ये आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ठरू नये ! याविषयी केंद्रातील भाजप सरकारने हस्तक्षेप करत मंदिरांच्या रक्षणासाठी पाऊल उचलले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे समांतर व्यवस्था उभारू पहाणार्या धर्मांधांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी हिंदूंवर कारवाई करणे, हे संतापजनक ! केरळमध्ये हिंदुद्वेषी, मुसलमानप्रेमी साम्यवाद्यांचे सरकार असल्याने हिंदूंवर विनाकारण कारवाई होते !
देशात कोरोनाच्या लसीकरणाच्या केवळ पहिल्या टप्प्यात लस विनामूल्य दिली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी आणि कोरोना काळात पहिल्या फळीत काम करणारे २ कोटी कर्मचारी यांना लस देण्यात प्राधान्य दिले जाणार आहे.