विरोधकांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमारावर चर्चा करण्याची केली होती मागणी

नवी देहली – संसदेत २७ जुलै या दिवशी परीक्षा सुधारणा विधेयकावर होणारी चर्चा विरोधी पक्षांच्या खासदारांनी घातलेल्या गदारोळामुळ होऊ शकली नाही. विरोधकांची मागणी होती की, जंतरमंतर येथे, तसेच बिहारच्या सीवान येथे कथित विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या, तसेच गोळीबाराच्या घटनेवर चर्चा करण्यात यावी. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी खासदारांना सांगितले, ‘मी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ देतो. सरकार आणि विरोधी खासदार यांनी याविषयावर चर्चा करून विषय मांडावा.’ मात्र या विषयावर सहमती झाली नाही. त्यापूर्वी लोकसभा आधी दुपारी १२ वाजेपर्यंत, नंतर २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. राज्यसभेचीही अशीच स्थिती होती. येथेही सभागृह २ वेळा स्थगित करण्यात आले आहे. नंतर सायंकाळी ५.१५ वाजता ते दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. यापूर्वी सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लोक परीक्षा सुधारणा विधेयक सादर केले.
दुसरीकडे माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर पहिल्यांदाच संसदेत पोचले. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी त्यांना शाल घालून सन्मानित केले आणि संसद भवनाच्या आतपर्यंत घेऊन गेले.
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court