
नवी मुंबई – कारगिल युद्ध हे भारतीय सैनिकांचा अजोड पराक्रम आणि अजिंक्य मनोबल यांची अमरगाथा आहे, असे वक्तव्य कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त) यांनी वाशी येथे केले. जम्मू-कश्मीर डोगरा समाज, सावरकर विचार मंच आणि कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘कारगिल विजयदिन’ कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रारंभी विद्यार्थ्यांनी ‘अमर ज्योती’च्या प्रतिकृतीला आदरांजली वाहिली. कर्नल गोयल यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांच्या स्मृतीला श्रद्धांजली देण्यात आली.
कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त) म्हणाले, ‘‘कारगिल युद्ध हे जगातील सर्वांत उंच युद्धभूमीवर लढलेले युद्ध आहे. १४ ते १८ सहस्र फूट उंचीवरील डोंगरमाथ्यावरील ठाणी शत्रूने धोक्याने काबीज केली होती. नियंत्रण रेषेचे उल्लंघन न करता कडाक्याच्या थंडीत अनेक सहस्र फुटांची पर्वतरांग चढून जाऊन ही शिखरे भारतीय सैनिकांनी जिंकून घेतली.’’ या वेळी त्यांनी कारगिल युद्धातील अनुभव कथन केले.
व्यासपिठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या शुभदा नायक, चित्रपट अभिनेते मुकेश ऋषी, विहिंपचे राष्ट्र्रीय प्रवक्ते शंकर गायकर, प्रा. राजश्री घोरपडे, प्रा. सारंग भागवत, जम्मू-कश्मीर डोगरा समाजाचे अध्यक्ष कृष्णा पंडित आणि सावरकर विचार मंचचे अध्यक्ष संतोष कानडे उपस्थित होते.
कृष्णा पंडित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर मुकेश ऋषी आणि संतोष कानडे यांनी कारगिल युद्धाबद्धल आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. प्रो. सारंग भागवत यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सुप्रिया देशपांडे यांच्या वन्दे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले