
पुणे, २७ जुलै (वार्ता.) – माळशेज घाटाच्या अलीकडे कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर करंजाळे येथे ७ फूट रस्ता खचला असल्याने तेथील वाहतुकीमध्ये पालट करण्यात आला आहे. माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून हा निर्णय सुरक्षिततेच्या कारणास्तव घेतल्याचे माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. या रस्त्याला २५ जुलै या दिवशी मोठी भेग पडली होती. रात्रभर झालेल्या पावसामुळे २६ जुलैला रस्त्याखालील माती वाहून गेली आणि रस्ता ७ फुटाने खाली खचला. या घटनेनंतर बांधकाम विभागाने या ठिकाणी सुरक्षा कठडे लावून एकेरी वाहतूक चालू केली होती. आता ही वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे. आता पर्यायी मार्गाने म्हणजे आळेफाटा येथून नारायणगाव, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळामार्गे मुंबईला जाण्यासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकार्यांनी जारी केले आहेत.
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना २ ऑगस्टला ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार !