२७ जूनपासून पावसाळी अधिवेशनास प्रारंभ !

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून चालू होत आहे. २८ जून या दिवशी राज्याचा उर्वरित काळासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 

अमली पदार्थ मेजवानी झालेल्या ‘एल्-३ बार’चा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून निलंबित !

पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी अवैध पब्जवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच अमली पदार्थांशी निगडीत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.

आळंदी देवस्थानचे प्रमुख योगी निरंजन यांची आंदोलनाची चेतावणी

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आषाढी वारी सोहळ्यावर इंद्रायणीच्या प्रदूषित पाण्याचे संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सातत्याने रसायनमिश्रित पाणी थेट नदीत सोडले जात आहे.

सिन्नर (नाशिक) येथे संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रिंगण सोहळा !

नाशिकच्या महापालिका आयुक्तांकडून या पालखीचे भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले. या पालखीचा रिंगण सोहळा या वेळी पार पडला.

कंत्राटी शिक्षक शिकवत नसल्याने विद्यार्थ्यांचा नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा !

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १२० मधील विद्यार्थ्यांना ‘आयटीच’ या संस्थेमार्फत कंत्राटी पद्धतीने शिक्षकांचा पुरवठा करण्यात आला आहे

भूलतज्ञ सुटीवर गेल्याने हृदयाच्या शस्त्रक्रिया ठप्प !

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (‘एम्स्’मध्ये) कार्डियाक ॲनेस्थेसिया तज्ञ १ महिन्याच्या सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे १५ दिवसांपासून हृदयाच्या बायपास शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत.

कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा !’

या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये नि:स्वार्थी सेवा करत असलेल्या महनीय लोकांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भविष्यातील नोकरीच्या संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास शिक्षणावर भर द्यावा ! – सोमनाथ वास्कर, माजी नगरसेवक

मंगल भोईर म्हणाले की, मुलांनी या आर्थिक साहाय्याची जाणीव ठेवली पाहिजे. आई – वडील यांच्या नंतर ज्यांनी आपल्या आयुष्यात विविध टप्प्यांवर साहाय्य केले, त्यांना कधीही विसरता कामा नये.

माणसाला नदीशी जोडल्यास देश पूर आणि दुष्काळमुक्त होईल !- जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग

पाऊस संपल्यावर कोकणातील नद्या कोरड्या पडतात. स्वतःचे जलस्रोत निर्माण झाल्यास येथील नद्याही बारमाही वाहतील.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा दुसरा दिवस दिवस (२५ जून) : राष्‍ट्र आणि धर्म रक्षण यांकरिता केलेले प्रयत्न

हिंदू लहान वयात त्‍यांच्‍या मुलींना भगवद़्‍गीता का शिकवत नाहीत ? ‘परधर्मापेक्षा स्‍वधर्म श्रेष्‍ठ आहे’, याची शिकवण भगवद़्‍गीतेमध्‍ये देण्‍यात आली आहे. हे शिक्षण मिळाले, तर हिंदु युवती लव्‍ह जिहादला बळी पडणार नाहीत. कायद्याने नाही, तर संस्‍कार आणि संस्‍कृती यांमुळेच लव्‍ह जिहादला रोखता येईल.