लोक बघ्याच्या भूमिकेत का गेले ? याचे आश्‍चर्य वाटते ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

असे प्रकार तुमच्या आजूबाजूला घडत नाहीत ना ? याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

‘वांद्रे-वर्सोवा सी लिंक’ला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याला मंत्रीमंडळाची मान्यता !

‘वांद्रे-वर्साेवा सी लिंक’ या समुद्रीमार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे, तर मुंबई पारबंदर प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या निर्णयाला २८ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

सांगली जिल्ह्यात ‘महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम’ची काटेकोर कार्यवाही व्हावी ! – गोरक्षकांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मिळत असलेल्या खात्रीशीर माहितीनुसार कारवाईच्या प्रसंगी पिंपरी, मालेगावप्रमाणे प्राणी रक्षण पथक उपलब्ध व्हावे, तसेच सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमची काटेकोर कार्यवाही व्हावी असे निवेदन पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांना देण्यात आले.

द्रमुकचा हिंदुद्वेष जाणा !

‘समान नागरी कायदा प्रथम हिंदु धर्माला लागू केला पाहिजे’, अशी मागणी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे नेते टी.के.एस्. एलंगोवन यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्याचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यामुळे हिंदु पीडितेला न्याय !

हिंदु स्त्रिया अधिक वेळ सामाजिक माध्यमांमध्ये अडकलेल्या असतात. चित्रपटांमध्ये जाणीवपूर्वक हिंदु नायिका आणि धर्मांध नायक दाखवला जातो. या माध्यमातून थेट ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जाते आणि हिंदू पैसे व्यय करून असे चित्रपट पहात असतात. त्यामुळे हिंदु मुली-महिला अल्पावधीत वासनांध धर्मांधांच्या जाळ्यात ओढल्या जातात.

वारकरी संप्रदायाचा महामंत्र अन् त्याचा अर्थ

‘रामकृष्ण हरि ।’ याचा अर्थ ‘रामासारखे आचरण ठेवले, तरच आज ना उद्या मनाने कृष्ण होता येते आणि मनाने कृष्ण झाल्याविना जगत् हरिरूप भासत नाही.’ यालाच ‘जीवन्मुक्ती’ असे म्हणतात. ही जीवनाची इतिश्री होय.’

विठ्ठलाच्या नामजपामुळे व्याधींपासून मुक्तता मिळत असल्याचे आधुनिक वैद्यांनी सिद्ध करणे !

‘पंढरपूरची वारी ही अतिशय विस्मयकारक आणि सर्वसामान्य मानवजातीला वरदानच ठरलेली आहे. सर्व वारकर्‍यांना काही ना काहीतरी व्याधी असते. असे असूनही ‘ते अडीचशे मैल अनवाणी प्रवास करून त्यांची प्रकृती उत्तम कशी रहाते ?’, याचे उत्तर आधुनिक वैद्यांनी प्रयोगाअंती शोधून काढले…

विठ्ठलाची उपासना भक्तीभावाने करण्यास सांगणारे सनातनचे ग्रंथ !

प्रस्तुत ग्रंथात पांडुरंग, पंढरपूर इत्यादींचे माहात्म्य; तसेच वारी व वारकरी यांच्या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन दिले आहे. आद्य शंकराचार्यविरचित ‘पांडुरंगाष्टकम्’चा अर्थही दिला आहे. भक्तीरसात डुंबवणारा हा ग्रंथ वाचून विठ्ठलभक्त व्हा !