‘द केरल स्टोरी’ चित्रपटामुळे अकोला येथे झालेल्या हिंसाचारात एका मुलाचा मृत्यू, तर महिला हवालदारासह ९ जण घायाळ !

पोलिसांनी अकोल्यातील हरिहरपेठ परिसरात कलम १४४ लागू केले असून २६ जणांना कह्यात घेतले आहे.

खाजगी वाहतूकदारांकडून मनमानी भाडे आकारणीविषयी तक्रार करण्याचे  प्रशासनाचे आवाहन

जादाचे भाडे आकारणार्‍या बसमालकांविरुद्ध पुराव्यानिशी लेखी स्वरूपात छायाचित्रासह या कार्यालयाच्या ई-मेल पत्ता dyrto. [email protected] अथवा (०२३५२)२२९४४४ या कार्यालयाच्या क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असे आवाहन केले आहे. 

गोवंशियांच्या हत्या करणार्‍यांवर कारवाई न झाल्यास संपूर्ण तालुक्यात आंदोलन करणार !  

भर उन्हातून ग्रामस्थांना असे आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! राज्यात गोवंश हत्या बंदी असतांना प्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासनाने स्वत:हून गोहत्या करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करायला हवी !

मुंबईमध्ये घरगुती गणेशमूर्ती शाडूच्या मातीच्याच !

शाडूची माती ही नैसर्गिक असल्यामुळे त्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तीमुळे कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही. याउलट कागदी लगद्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तीमुळे प्रदूषण होते. त्यामुळे शाडूच्या मातीची गणेशमूर्ती पर्यावरणपूरक आहेत.

मशिदीत हनुमान चालिसा म्हणण्याची अनुमती द्या, अन्यथा तुमचे नाटक बंद करा ! – महंत अनिकेतशास्त्री

महंत अनिकेतशास्त्री यांनी ‘मशिदीत हनुमान चालिसा म्हणण्याची अनुमती द्या !’ अशी मागणी करत चेतावणी दिली की, भाईचार्‍याच्या नात्याने आम्हालाही मशिदीत हनुमान चालिसा म्हणण्याची अनमुती द्या, अन्यथा तुमचे नाटक बंद करावे.

अजूनही हिंदू एक होत नाहीत ! – शरद पोंक्षे यांची खंत

हिंदू अजून एक होत नाहीत. जागे होत नाहीत, यासारखे दुःख नाही. ऐकूया सावरकर, वाचूया सावरकर. आपण सगळ्यांनी एक होऊया. हिंदु धर्मातील सर्व जाती संपवून ‘हिंदु’ ही एकमेव जात निर्माण करूया. हेच या माणसाने स्वप्न पाहिले. ते आपण पूर्ण करूया.

अर्जुन राम मेघवाल हे नवे कायदामंत्री !

केंद्रशासनाने कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या खात्यात पालट केला असून त्यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे. अर्जुन राम मेघवाल हे आता नवे कायदामंत्री असतील.

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रे’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत उज्जैन येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रा’ काढण्यात आली.

सिद्धरामय्या होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री !

चार दिवसांच्या मनधरणीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला असून सिद्धरामय्या हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. डी.के. शिवकुमार यांनी सध्या तरी उपमुख्यमंत्री पदावर समाधान व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत, तर तमिळनाडूतील जल्लीकट्टूवरील बंदी उठली ! – सर्वोच्च न्यायलय

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला, तसेच तामिळनाडूतील जल्लीकट्टू खेळाला अनुमती देणार्‍या कायद्यांना आव्हान देणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या खंडपिठाने हे खेळ खेळण्याची अनुमती दिली आहे.