शिर्सुफळ (बारामती) येथील श्री शिरसाईदेवीच्या मंदिरात चोरी !

चोरीच्या घटनेचा निषेधार्थ ग्रामस्थांकडून गाव बंद
हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

जमावबंदी आदेश धाब्यावर बसवून पुण्यातील लोहगडावर चालू आहे दर्ग्याच्या ऊरुसाची सिद्धता !

छत्रपती शिवरायांनी मोगलांपासून रक्षण केलेल्या गड-किल्ल्यांचे स्वतंत्र भारतात मात्र इस्लामीकरण होण्याचा धोका !

कोईंबतूर (तमिळनाडू) येथे पेरियार यांच्या पुतळ्याला अज्ञातांनी घातला चपलांचा हार, डोक्यावर भगवा रंग टाकला !

या घटनेच्या विरोधात द्रविड कळघम् (द्रविड संघ) संघटनेकडून निदर्शने करण्यात आली. पोलीस सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द !

पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ जानेवारी या दिवशी पुणे दौर्‍यावर येणार होते. मात्र कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांचा हा दौरा रद्द केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला दिली आहे.

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या मदर तेरेसा यांच्या संस्थांना पैसे देणार्‍या ओडिशा सरकारचा विहिंपकडून निषेध

हिंदूंचे मठ आणि मंदिरे यांचे सरकारीकरण करून त्यांच्या अर्पणावर डल्ला मारणार्‍या; मात्र ख्रिस्ती संस्थांवर खैरात करणार्‍या बिजू जनता दल सरकारला आता हिंदूंनी वैध मार्गाने जाब विचारणे आवश्यक !

‘सिख फॉर जस्टिस’ने घेतले पंतप्रधान मोदी यांचा वाहन ताफा अडवण्याचे दायित्व !

बंदी घातलेल्या आणि अमेरिकेतून चालवण्यात येणार्‍या खलिस्तानी संघटनेकडून भारतात अन् तेही पंतप्रधान मोदी यांचा ताफा अडवण्याचे धाडस करतेच कसे ? सुरक्षायंत्रणा झोपलेल्या आहेत का ? कि त्या खलिस्तान्यांना फितूर झाल्या आहेत ?

सर्वोच्च न्यायालयाकडून निवृत्त न्यायाधिशांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चौकशी स्थमिती स्थापन

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या वेळी सुरक्षाव्यवस्थेत झालेल्या अक्षम्य चुकीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिरुपती येथील जलक्षेत्रावर अतिक्रमण करून हिरा इस्लामिक विद्यापिठाने केलेले अवैध बांधकाम हटवण्याचा आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश

बहुतांश इस्लामिक संघटना या भूमी जिहाद करतांना दिसतात. हाही त्यातलाच प्रकार आहे. हे प्रकार रोखण्यासाठी धर्मांधांवर वचक बसेल, अशी कारवाई करणे अपेक्षित !

हिंदूचे घर जाळले, तर मुसलमानाचे घर कसे सुरक्षित राहील ? – योगी आदित्यनाथ

जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या आणि पंथाच्या लोकांची हानी होते. जर हिंदूचे घर जाळले, तर मुसलमानाचे घर थोडीच सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित असेल, तर मुसलमानही सुरक्षित असेल.

अल्प वेळेत आणि अल्प खर्चात न्याय मिळण्यासाठी न्यायालयांचे विकेंद्रिकरण आवश्यक ! – न्यायमूर्ती भूषण गवई, सर्वाेच्च न्यायालय

औरंगाबाद खंडपिठासाठी सुद्धा विरोध झाला होता. आता त्याचा लाभ अनेक जिल्ह्यातील पक्षकारांना होत आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, ही मागणी योग्यच आहे.