माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन तूर्तास स्थगित !

शासन निर्णयानुसार कांदा-बटाटा बाजार आवारात कांदा-बटाटा मालांच्या ५० किलोहून अधिक वजनाच्या गोणी उचलण्यास माथाडी कामगारांनी नकार दिला होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने अन्नदान !

कोरोना संसर्गाच्या काळापासून कोल्हापुरात येणारा कोणताही गरीब आणि गरजू उपाशी राहू नये, या हेतूने चालू असलेली उत्तरेश्वर थाळी हा कौतुकास्पद उपक्रम असून शिवसेनाप्रमुखांना हीच खरी आदरांजली आहे.

महाराष्ट्रात आता अल्पसंख्यांक समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण ठरवण्यात येणार !

शासनाकडून अभ्यासगटाची स्थापना

(म्हणे), ‘मुस्लिम आरक्षणासाठी समाजाने रस्त्यावर उतरावे का ?’ – असदुद्दीन ओवैसी, खासदार, एम्.आय.एम्.

मुसलमानांची सामाजिक आणि आर्थिक दुर्बलता न्यायालयाने मान्य केली आहे, तर अडचण काय आहे ? आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला. आता आम्हीही (मुसलमानांनी) रस्त्यावर उतरावे का ? तुम्हालाही तेच हवे आहे का ?’,- खासदार ओवैसी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थीकलशाचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये शिवप्रेमींनी घेतले दर्शन !

ज्या शिवप्रेमींना अंत्यदर्शनासाठी उपस्थित रहाता आले नाही, त्यांना त्यांच्या अस्थींचे दर्शन घेता यावे, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हा अस्थीकलश मुंबईमध्ये आणण्यात आला होता.

एस्.टी.च्या खासगीकरणाच्या पर्यायांविषयी अभ्यास चालू ! – अनिल परब, परिवहनमंत्री

सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी खासगीकरण हाही एक पर्याय आहे; मात्र याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. अन्य राज्यांमधील परिवहन मंडळांचा अभ्यास करून आपण आपल्या राज्यांविषयीचा निर्णय घेऊ.

विदर्भात शेतकर्‍यांचा असंतोष असल्याने शरद पवार यांनी येऊ नये ! – अनिल बोंडे, नेते, भाजप

मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विनंती केली होती की, येथे शेतकर्‍यांचा असंतोष आहे. त्यामुळे त्यांनी येथे येऊ नये. असंतोष आणि अस्वस्थता त्यांना त्यांच्या नागपूरच्या दौर्‍यात दिसली असेल.

लाच प्रकरणात सैन्यातील २ अधिकार्‍यांना अटक !

सैन्यातील अधिकारीही भ्रष्टाचार करत असतील तर देशाचे भवितव्य सुरक्षित कसे राहू शकेल ?

शिधावाटप दुकानांमध्ये साबण, ‘हॅण्डवॉश’, चहापत्ती, कॉफी मिळणार !

रास्तभाव दुकानदार आणि संबंधित आस्थापन अन् घाऊक-किरकोळ विक्रेते यांमध्ये हा व्यवहार परस्पर असणार आहे. यामध्ये शासनाचा हस्तक्षेप असणार नाही.

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे अनेक वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनाला मुकले !

देशभरातील कानाकोपर्‍यांतून श्री विठ्ठलाचे भक्त कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे येतात. एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे अनेक वारकर्‍यांना कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे येता आले नाही.