केकमधून अमली पदार्थ विकणार्‍या धर्मांध आधुनिक वैद्याला अटक !

केक आणि ब्राऊनी यांमध्ये अमली पदार्थ भरून त्यांची विक्री करणार्‍या रहमीन या आधुनिक वैद्याला अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईतून अटक केली आहे.

सी.एन्.जी.सह पाईप गॅसच्या दरात वाढ !

ट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या पाठोपाठ सी.एन्.जी. आणि पीएनजी गॅसच्या मूल्यातही १४ जुलैपासून वाढ करण्यात आली आहे.

महापालिकेने नेमलेल्या लेखापरीक्षकांनी खासगी रुग्णालयांच्या देयकांची रक्कम अल्प करण्यास भाग पाडले !

रुग्णांच्या देयकांची रक्कम अल्प करण्यासमवेत अधिक रक्कम लावलेल्या रुग्णालयांना शिक्षा होणे अपेक्षित आहे !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नीला ‘ईडी’चे समन्स !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर त्यांचा मुलगा ऋषिकेश आणि पत्नी सौ. आरती यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (‘ईडी’) ‘समन्स’ बजावण्यात आले  आहे. आरती देशमुख यांना १५ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता ‘ईडी’च्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत

राज्यातील निर्बंध शिथिल करण्याविषयी ‘टास्क फोर्स’ समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर !

पहिल्या टप्प्यात उपाहारगृहे उघडण्यासाठी सवलती घोषित केल्या जाणार आहेत. उपाहारगृहे चालू ठेवण्याची वेळ रात्री १० वाजेपर्यंत केली जाणार आहे, तर ५० टक्क्यांची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाणार असल्याचे समजते.

नक्षलवाद्यांना शस्त्रांसह साहित्य पुरवठा केल्याप्रकरणी १३ जणांना अटक !

गोंदिया येथील ६ जणांचा सहभाग !, साहित्य पुरवण्यासाठी १ कोटी रुपयांचा व्यवहार, संपूर्ण नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना कायमस्वरूपी संपणार नाहीत, हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात कसे येत नाही ? संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात गोळा केलेल्या ‘ओबीसीं’च्या ‘डेटा’मध्ये ६९ लाख चुका होत्या ! – चंद्रशेखर बावनकुळे, नेते, भाजप

‘डेटा’मध्ये लाखो चुका होणे हे तत्कालीन सरकारला लज्जास्पद ! इतक्या चुका करणार्‍यांना वेळीच शासन का केले नाही ?

राज्य मानवाधिकार आयोगाची पदे भरण्यासाठी राज्य सरकारला दोन मासांची मुदत !

राज्य मानवाधिकार आयोगातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन मासांची मुदत दिली आहे. १२ जून या दिवशी सरकारच्या वतीने आयोगावर नियुक्तीसाठी निवडलेल्या नावांची सूची सादर करण्यात आली.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असतांनाही नगर येथील लग्नसोहळ्याला ३०० लोकांची उपस्थिती !

नियम मोडणार्‍या अशा नागरिकांमुळेच कोरोना आटोक्यात येत नाही. असे नागरिक स्वतःसह इतरांचेही आयुष्य धोक्यात घालत आहेत.

सांगलीत दळणवळण बंदीच्या निषेधार्थ व्यापार्‍यांचे ‘भीक मागा’ आंदोलन !

संपूर्ण बाजारपेठ या दळणवळण बंदीमुळे उद्ध्वस्त झाली आहे. एकीकडे विविध राजकीय पक्षांच्या विविध कार्यक्रमांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे आणि दुसरीकडे नियम पाळूनही व्यापार्‍यांना सरकार धंदा करण्यास अनुमती देत नाही.