‘डेटा’मध्ये लाखो चुका होणे हे तत्कालीन सरकारला लज्जास्पद ! इतक्या चुका करणार्यांना वेळीच शासन का केले नाही ?
नागपूर – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात गोळा करण्यात आलेल्या ‘ओबीसीं’च्या ‘इंपेरिकल डेटा’मध्ये एकूण ६९ लाख चुका होत्या. चव्हाण यांना हे सर्व ठाऊक असतांना ते ‘ओबीसीं’च्या सूत्रावरून खोटे बोलत आहेत. ‘ओबीसीं’च्या राजकीय आरक्षणाच्या सूत्रावर महाविकास आघाडी सरकारचे ‘खोट बोल; पण रेटून बोल’ आणि ‘ओबीसीं’चा सत्यानाश कर’, असे धोरण आहे, असा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी १४ जुलै या दिवशी येथे केला आहे.