राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई चौधरी यांना अटक !

‘६ जुलैला चौधरी यांची चौकशी करण्यात आली; मात्र या ते सहकार्य करत नव्हते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली’, असे ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

गुन्हेगार महिलांचे वाढते प्रमाण चिंताजनक !

काही महिला गुन्हेगारांकडून बनावट (खोटी) कागदपत्रे दाखवून केली जाणारी फसवणूक, परस्पर घरे विकणे, आर्थिक अपहार असे प्रकार होतांनाही दिसत आहेत.

आईची हत्या करणारा आरोपी सुनील रामा कुचकुरवी याला मरेपर्यंत फाशी

समाजातील आसुरी वृत्ती बळावत चालल्याचे, हे उदाहरण आहे. यामध्ये पालट होण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

टाळ-मृदुंगाच्या निनादात रंगला संत सोपानदेवांचा पालखी प्रस्थान सोहळा !

६ ते १८ जुलै या कालावधीत पालखीचा मुक्काम समाधी मंदिरात सासवडलाच असेल. आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे १९ जुलै या दिवशी सरकारने दिलेल्या २ बसमधून ‘श्रीं’च्या पादुका पंढरपूरकडे प्रस्थान करतील.

हिंदु सेवा साहाय्य समिती आणि गोरक्षक यांनी वाचवले २१ गोवंशियांचे प्राण, ४ धर्मांधांना अटक !

नेहमी गोवंशियांना कत्तलीसाठी नेण्यात येण्याची माहिती केवळ गोरक्षकांनाच का मिळते ? याचा पोलिसांनी विचार करायला हवा.

अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

‘श्री सत्यनारायण कथा आणि भागवत कथा अवैज्ञानिक आहेत’, असे विधान केल्याच्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे गुजरातमधील अध्यक्ष गोपाल इटालिया यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

देशाला अपकीर्त करण्यासाठी राष्ट्रविरोधी टोळी विदेशी शक्तीचा उपयोग करत आहे ! – विनोद बन्सल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद

बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात ‘श्रीरामाचे अस्तित्व होते’, हे पटवून देण्यासाठी, तसेच त्याच्या जन्मभूमीच्या मुक्तीसाठी संघर्ष करावा लागला, यातूनच हे अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र असल्याचे लक्षात येते.

धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार संघटित होऊन नोंदवावी ! – अधिवक्ता युधवीरसिंह चौहान, देहली उच्च न्यायालय

हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यास कुणीही तक्रार करण्यास धजावत नाही. याउलट इतर धर्मांतील लोक त्यांच्या धर्माविषयी कुठे उलट-सुलट बोलले जात नाही ना ? यावर लक्ष ठेवून असतात.

केंद्र सरकारने ‘पेटा’वर भारतात बंदी आणायला हवी ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वाेच्च न्यायालय

‘पेटा’ने केवळ हिंदूंच्या विविध धार्मिक प्रथा आणि परंपरा यांच्या वेळी प्राण्यांवर होणारे आघात रोखण्यासाठी लढा दिल्याची उदाहरणे दिली आहेत; मात्र ‘बकरी ईदच्या दिवशी प्राण्याचा बळी दिला जाऊ नये’ म्हणून ते प्रचार करत नाहीत….