जीवनाचे गुह्य ज्ञान शिकवणारी गुढी !

जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेस वर्षारंभ करण्याची कारणे

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला प्रारंभ झाला, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

सर्वोच्च न्यायालयाचे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी होणार

सर्वोच्च न्यायालयातील ५० टक्के कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. न्यायालयाचे कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने न्यायाधीश घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत.

नववर्षाचा संकल्प !

येत्या नववर्षाच्या भीषणतेमध्ये तरून जाण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्राला शरण जावे लागेल. तशी भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून करावा लागेल. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. त्यामुळे भक्त बनून स्वतःचे, समाजाचे आणि देशाचे रक्षण करा !

१४ एप्रिलच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री दळणवळण बंदीची घोषणा करण्याची शक्यता ! – राजेश टोपे

१४ एप्रिल या दिवशी होणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दळणवळण बंदीची घोषणा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय उडवून देण्याची इस्लामिक स्टेटकडून धमकी

रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय उडवून देऊ, अशी धमकी ८ एप्रिलला ई-मेलद्वारे आली होती. या पत्रात ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचा उल्लेख होता. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. इमारती भोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

शोपियामध्ये आतंकवाद्यांनी ठार होण्यापूर्वी मशिदीला आग लावल्याचा प्रयत्न केल्याचे उघड !

९ एप्रिल या दिवशी सुरक्षादलांनी ५ आतंकवाद्यांना चकमकीत ठार केले. हे आतंकवादी येथील एका मशिदीमध्ये लपले होते. या आतंकवाद्यांनी मशिदीच्या एका भागाला आग लावण्याचा प्रयत्न केला होता, असे आता समोर आले आहे.

वर्षारंभी शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न करून स्वभाषाभिमान जोपासा !

शुद्ध भाषा उच्चारूनच जिवात हळूहळू चैतन्याचे बीज रोवले जाऊन ईश्‍वरी गुणांचे संवर्धन होऊ लागते. यासाठी इंग्रजी, फारसी, अरबी, उर्दू इत्यादी परकीय भाषांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी कृतीशील व्हा !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात भाव कसा ठेवावा ?

साधकांनी, तसेच धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी हिंदु राष्ट्रातच गुरु किंवा देव यांना पहायचा प्रयत्न केला, म्हणजे ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य, ही गुरुसेवा असून ते ईश्‍वरप्राप्तीचे साधन आहे’, असा भाव ठेवला, तर त्यांना हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याविषयी प्रेम वाटून त्यासाठी जीवन समर्पित करण्याची त्यांची सिद्धता होईल.’

कोरोनाबाधित रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुंबई महानगरपालिका सिद्ध करणार कृती आराखडा !

कोरोनाबाधित रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आता कठोर पावले उचलली जाणार आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी १२ एप्रिल या दिवशी प्रसिद्धमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.