काशीतील ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्‍वेश्‍वर मंदिर प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांचा पक्षकार बनवण्यासाठी अर्ज

मंदिर पक्षकारांकडून ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मथुरा येथे फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून विहंगम प्रसार

आदर्श रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अमरावती येथील सुश्री रामप्रियाजी यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट

संत प.पू. सुधांशू महाराज यांच्या येथील शिष्या सुश्री रामप्रियाजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सनातन संस्थेच्या सौ. बेला चव्हाण आणि सौ. छाया टवलारे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

हिरे व्यापारी मेहूल चोक्सीची १४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !

येथील पंजाब नॅशनल बँकेतील १३ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रिव्हेंशन अ‍ॅक्टअंतर्गत गीतांजली ग्रुप आणि याचे प्रमोटर मेहूल चोक्सी यांची येथील १४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी लष्करासाठी बैठकीत भाग घेतल्याचे सिद्ध करा ! – उच्च न्यायालयाचा आदेश

वर्ष २००८ मालेगाव (जिल्हा नाशिक) स्फोटाच्या संदर्भात अटक करण्यात आलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याकडून येथील उच्च न्यायालयात त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप काढून टाकण्यासाठी याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

नगरसेवक अण्णा लेवे यांचे आरोप तथ्यहीन ! – नगराध्यक्षा माधवी कदम

केवळ विहित माहिती दिली नाही म्हणून प्रशासन भ्रष्टाचारात बरबटलेले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कोरोना काळातील खरेदीविषयीची माहिती एक नगरसेवक किंवा विश्‍वस्त म्हणून अण्णा लेवे यांनी घेणे महत्त्वाचे होते.

सामाजिक संकेतस्थळावर छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

राज्यात महिलांची सुरक्षा धोक्यात ! आपल्या मुली अत्याचाराला बळी पडू नयेत, यासाठी त्यांना वेळीच स्वरक्षण प्रशिक्षण द्या !

सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी २ वैद्यकीय अधिकारी निलंबित

पोलिओ डोसाच्या ऐवजी बालकांना सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या चौकशीनंतर डॉ. भूषण मेश्राम आणि डॉ. महेश मनवर या वैद्यकीय अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले.

धाटवाडी येथे ग्रामस्थांनी कालव्यात उतरून आंदोलन केल्यावर १५ दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आश्‍वासन : आंदोलन मागे

आंदोलन केल्यावर १५ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन देणारे प्रशासन हे काम आधी का करू शकले नाही ? अशा प्रकारे प्रशासन आंदोलन करा मग मागण्यांची पूर्तता होईल, अशी नवीन कार्यपद्धत घालत आहे का ?

मोदी शासनाचा अपप्रचार करण्यात टुकडे-टुकडे गँग सक्रीय ! – गिरीराज सिंह, केंद्रीय मंत्री

केंद्रातील मोदी शासनाने केलेल्या चांगल्या कामगिरीविषयी अपप्रचार करण्यास टुकडे-टुकडे गँग आणि डावे सक्रीय असल्याचा आरोप केंद्रीय मासेमारमंत्री गिरीराज सिंह यांनी केला.