कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन वचनबद्ध !
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ग्वाही
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ग्वाही
सरकार एकीकडे स्वतःच्या मालकीच्या आस्थापनांचे खासगीकरण करत असतांना मंदिरांचे सरकारीकरण करत आहे. भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष असतांना मशीद, चर्च यांचे सरकारीकरण न करता केवळ हिंदु मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे !
गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहून आवाज उठवीन, असे आश्वासन भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी अ. भा. कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना दिले.
सातारा, १ मार्च (वार्ता.) – म्हसवड तालुक्यातील पानवण येथे २७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी शेताच्या कामानिमित्त गेलेले आधुनिक वैद्य नानासाहेब शिंदे रात्री उशिरापर्यंत परत आले नाहीत.
कोल्हापूर – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जोतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी असणारे सर्व रस्ते प्रशासनाने २८ फेब्रुवारी या दिवशी बंद केले.
म्हादई जलवाटप तंटा लवाद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे प्रविष्ट असतांनाही कर्नाटक राज्य अनधिकृतपणे म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवणे चालूच ठेवत असल्याचे उघड झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कुणकेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेच्या नियोजनाविषयी देवस्थानच्या विश्वस्तांसह पालकमंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी ते बोलत होते.
सांगली – सांगलीच्या मध्यवर्ती असणारी काळी खण गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली होती.
सातारा – संभाजीनगर येथील पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हिरा गुटख्याची वाहतूक करणार्या ३ गाड्यांसह ३ आरोपींना कह्यात घेतले होते. या वेळी त्यांच्याकडून गुटख्याची २३ पोती आणि ३ वाहने असा ७ लाखांहून अधिक मुद्देमाल शासनाधीन केला.
लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील कसाल मंडल अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी निलंबित केले आहे. कायदेशीर खरेदी केलेल्या भूमीच्या खरेदी खताची सातबारावर नोंद करण्यासाठी संदीप हांगे यांनी संबंधिताकडे ४ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.