तमिळनाडूमध्ये प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर क्रॉस रेखाटून त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न !

तमिळनाडूत अण्णाद्रमुकच्या जयललिता मुख्यमंत्री असतांना खोट्या आरोपांखाली शंकराचार्य यांना अटक करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. आज त्याच पक्षाचे सरकार सत्तेत असतांना तेथे हिंदुविरोधी कारवायांमध्ये वाढ झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

मुंबईत अमली पदार्थांची विक्री करून हवालामार्गे आतंकवाद्यांना पैसा पुरवला जातो

मुंबईत अमली पदार्थांची विक्री होवून आतंकवाद्यांना पैसा जात असेल, तर पोलिसांनी हे लक्षात का आले नाही ? ही पोलिसांची निष्क्रियता नव्हे का ?

भुरट्या चोरांना मार्गावर आणण्यासाठी मुंबई पोलिसांची आरोपी दत्तक योजना !

गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने त्यांना अशा योजना राबवाव्या लागत आहेत. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत आरोपींना देण्यात येणारी रक्कम पोलिसांच्या खिशातून द्यायला हवी ! इथेही पोलिसांनी भ्रष्टाचार केला तर . . . !

ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी श्री हनुमानाचे चित्र पोस्ट करून मानले भारताचे आभार !

विदेशातील ख्रिस्ती राष्ट्रपतींनाही श्री हनुमानाचे महत्त्व ठाऊक आहे आणि त्याविषयी आदरही वाटतो, तसेच ते भारताकडे हिंदु राष्ट्र म्हणून पहातात, हेच यातून दिसून येते. ही भारतातील बुद्धीप्रामाण्यावाद्यांना चपराकच होय !

‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाषण करण्यास नकार !

स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणार्‍या ममता(बानो) बॅनर्जी यांना मुसलमानांचे लांगूलचालन केलेले चालते; मात्र श्रीरामाचा जयजयकार चालत नाही. यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो !

ईशनिंदाविरोधी कायदा बनवून श्रद्धास्थानांचा होणारा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदा करा !

आज नाटके, चित्रपट, वेब सिरीज, विज्ञापने, काव्ये, चित्रे आदींद्वारे धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे मोठ्या प्रमाणात विडंबन केले जात आहे. देवतांची विटंबना करणार्‍यांवर वचक बसावा यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता आहे.

हुन्नुरगी (कर्नाटक) गावातील बाळू बरगाले यांनी त्यांच्या नातवाचे नामकरण स्मशानभूमीत केले !

कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले, ‘‘स्मशानभूमीतील बारशाचा उपक्रम हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. लोकांनी श्रद्धेचे बाजारीकरण केल्यामुळे अंधश्रद्धा वाढली आहे.’’

या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल, तर शिवसेनाच हवी ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आकांक्षा होती की, शिवसेना संपूर्ण देशात गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची धडपड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी.

येत्या ३० जानेवारीला बेमुदत उपोषण चालू करण्याची अण्णा हजारे यांची घोषणा

केंद्र सरकार दिलेल्या लेखी आश्वासनांच्या कार्यवाहीची घोषणा करत नाही, त्याविना आंदोलन थांबणार नसल्याच्या पवित्र्यात अण्णा हजारे आहेत.

सनदशीर मार्गांनी केलेल्या प्रयत्नांना ईश्वरी साहाय्य मिळते ! – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती

अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित धर्मप्रेमींची विदर्भस्तरीय बैठक उत्साहात पार पडली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत …