|
‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने ममता बॅनर्जी यांना त्रास होत असेल, तर त्यांनी शेजारील बांगलादेशमध्ये निघून जावे !

कोलकाता (बंगाल) – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जगदीप धनखड, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होते. या वेळी त्यांना भाषणासाठी आमंत्रित करण्यात आल्यावर उपस्थित लोकांकडून ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी यावर संताप व्यक्त केला.
(म्हणे) ‘सरकारी कार्यक्रमाचा मान राखणे आवश्यक !’ – ममता बॅनर्जी
#WATCH | I think Govt’s program should have dignity. This is not a political program….It doesn’t suit you to insult someone after inviting them. As a protest, I won’t speak anything: WB CM Mamata Banerjee after ‘Jai Shree Ram’ slogans were raised when she was invited to speak pic.twitter.com/pBvVrlrrbb
— ANI (@ANI) January 23, 2021
ममता बॅनर्जी यांनी या घोषणाबाजीवर आक्षेप घेतांना, ‘सरकारच्या कार्यक्रमाचा मान ठेवणे आवश्यक आहे. हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. येथे कुणाला आमंत्रित करण्यात आल्यानंतर त्याला अपमानित करणे शोभा देत नाही. मी विरोधात काही बोलणार नाही. जय हिंद, जय बांगला’ असे म्हणत त्यांनी त्यांचे भाषण संपवले.
(मोहरमच्या निमित्ताने मुसलमानांना मिरवणूक काढता यावी, यासाठी श्रीदुर्गादेवीची मिरवणूक रोखणे, राज्यात दंगली घडवणार्या धर्मांधांवर कारवाई न करणे या गोष्टी सरकारी नियमावलीत बसतात का ? स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणार्या ममता(बानो) बॅनर्जी यांना मुसलमानांचे लांगूलचालन केलेले चालते; मात्र श्रीरामाचा जयजयकार चालत नाही. यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो ! – संपादक)
ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीही ‘जय श्रीराम’ घोषणांचा विरोध केला होता. राज्यात ममता बॅनर्जी एका ठिकाणी दौर्यावर असतांना काही लोकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने त्या संतप्त झाल्या होत्या. यानंतर घोषणाबाजी करणार्यांवर कारवाई करण्यात आली होती.
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक