सिंधुदुर्गात कोरोनामुळे आणखी २ मृत्यू

गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४४ झाली आहे.

पाळधी (जिल्हा जळगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयात धर्मांधाने बळजोरीने टिपू सुलतानची प्रतिमा लावली !

उद्दाम धर्मांध ! शासकीय कार्यालयात क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या प्रतिमेची काय आवश्यकता ?

विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांकडून तळोजा (जिल्हा रायगड) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्याविषयी पोलीस आयुक्तांकडे तक्रार

पोलीस आयुक्तांनी या गंभीर आरोपांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे !

नक्षलवाद्यांच्या आक्रमणात नाशिक येथील सैनिक नितीन भालेराव हुतात्मा

छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात येथील  सी.आर्.पी.एफ्.चे जवान नितीन भालेराव हुतात्मा झाले आहेत. रात्री नक्षलवाद्यांनी दोन आयईडी स्फोट घडवून आणले.

पंतप्रधान मोदी पुण्यात आल्यावर संत श्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी घोषणा देणारे ३ तरुण पोलिसांच्या कह्यात

कोरोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी २८ नोव्हेंबर या दिवशी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच त्यांना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतून संत श्री आसारामजी बापू यांच्या सुटकेच्या घोषणा देण्यात आल्या.

श्री जोतिबा डोंगरावर कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने लाखाहून अधिक भाविक

कार्तिक पौर्णिमेनिमित्त पन्हाळा तालुक्यातील श्री जोतिबा डोंगरावर श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक येथून लाखाहून अधिक भाविक आले होते. यामुळे डोंगरावर यात्रेचेच स्वरूप प्राप्त झाले होते. ‘चांगभल’च्या घोषणेने डोंगर दणाणून गेला.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती दिलासाजनक !

गेल्या ४ दिवसांपासून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती दिलासाजनक आहे. गेल्या ३ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, तसेच रुग्ण संख्याही सातत्याने घटत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी आगार अव्वल : दिवाळी प्रवासी हंगामात ८९ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न !

दिवाळीचा हंगाम यंदा इचलकरंजी आगाराला अनुकूल ठरला आहे. दिवाळीच्या प्रवासी हंगामात आगाराला ८९ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. कोरोना काळातही मिळालेल्या या उत्पन्नामुळे इचलकरंजी आगार कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.

महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी !

प्रेमाच्या नावाखाली अनेक मुली आणि महिला यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात उत्तरप्रदेशात एका अध्यादेशाद्वारे लव्ह जिहाद कायदा लागू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही असा कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची विदेशी चलन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आली आहे. १० घंटे ही चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. याविषयी अंमलबजावणी संचालनालयाने अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगितलेले नाही.