केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रात कायदा आणणार !- बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि शेतमालाला हमी भाव दिला नाही, तर संबंधितांविरुद्ध खटला चालवण्याची तरतूद असलेला कायदा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

देहलीमध्ये मास्क न वापरणार्‍यांना आता २ सहस्र रुपयांचा दंड होणार

देहलीमध्ये गेल्या २४ घंट्यांमध्ये ७ सहस्र ४८६ नवे रुग्ण आढळले. त्यानंतर आता देहली सरकारने देहलीत मास्क न घालणार्‍यांना २ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याची घोषणा केली. यापूर्वी ५०० रुपयांचा दंड होता.

प्रत्येक हॉटेलने एक खोली अलगीकरणासाठी ठेवणे बंधनकारक ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

हॉटेलमध्ये आलेला पर्यटक कोरोनाबाधित झाल्यास त्याला अलगीकरणात ठेवण्यासाठी प्रत्येक हॉटेल चालकाला हॉटेलमधील एक खोली अलगीकरण सुविधेसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक असणार आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पर्वरीवासियांचा सा.बां. खात्याच्या कार्यालयावर मोर्चा

आमदार रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली शंभराहून अधिक पर्वरीवासियांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पर्वरी येथील कार्यालयावर मोर्चा नेला. पर्वरी परिसरात गेले काही मास पाण्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असल्याने हा मोर्चा नेण्यात आला.

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे निधन

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा (वय ७८ वर्षे) यांचे १८ नोव्हेंबर या दिवशी बिहार येथे वृद्धापकाळाने निधन झाले. सौ. मृदुला सिन्हा यांनी वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत गोव्याचे राज्यपालपद भूषवले होतेे.

गोव्यात नवीन ‘मोटर वाहन कायद्या’ची कार्यवाही १ जानेवारीपासून

गोव्यात नवीन ‘मोटर वाहन कायद्या’ची १ जानेवारी २०२१ पासून कार्यवाही करण्यात येणार आहे. ही दिनांक आणखी पुढे ढकलता येणार नाही, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली.

काँग्रेसने हकालपट्टी केलेले उर्फान मुल्ला यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसने १७ नोव्हेंबर या दिवशी पुढील ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलेले काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे माजी प्रमुख उर्फान मुल्ला यांनी त्यांच्या समर्थकांसह १८ नोव्हेंबर या दिवशी भाजपात रितसर प्रवेश केला.

उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडून हिंदु जनसेवा समितीचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान

‘‘अशा समाजसेवी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यामुळे राज्याला कठीण परिस्थितीत कोरोना महामारीशी सामना करता आला.’’ – उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल

(म्हणे) ‘आप सत्तेवर आल्यास ७३ टक्के गोमंतकियांना विनामूल्य वीज मिळेल !’ – राघव चढ्ढा, आपचे देहलीतील आमदार

जनतेला फुकटे बनवणारे नव्हे, तर स्वावलंबी आणि उद्योगी बनवणारे राज्यकर्ते हवेत !

सुरूर (जिल्हा सातारा) येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी रोखली गोवंशियांच्या मांसाची तस्करी : दोघांना अटक

गोवंश हत्याबंदी कायदा असतांना गोवंशियांच्या मांसाची मोठ्या प्रमाणात तस्करी होणे हे प्रशासनाचे अपयशच होय. गोतस्कर आणि गोहत्या करणारे यांना कठोर शिक्षा न केल्याचेच हे फलित आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?