
मुंबई – केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि शेतमालाला हमी भाव दिला नाही, तर संबंधितांविरुद्ध खटला चालवण्याची तरतूद असलेला कायदा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची समिती स्थापन केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे हे शेतकर्यांच्या विरोधातील आहेत. त्याला विरोध म्हणून शेतकर्यांच्या स्वाक्षर्यांचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून ६० लाख स्वाक्षर्या जमा झाल्या आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळणे आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात मंत्र्यांची समिती गठीत करण्यात येणार आहे. यामध्ये व्यापार्यांनी शेतमालाला आधारभूत मूल्य दिले नाही, तर त्यांच्यावर खटला नोंदवण्याची तरतूद करण्यात येणार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक