
मुंबई – केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि शेतमालाला हमी भाव दिला नाही, तर संबंधितांविरुद्ध खटला चालवण्याची तरतूद असलेला कायदा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची समिती स्थापन केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे हे शेतकर्यांच्या विरोधातील आहेत. त्याला विरोध म्हणून शेतकर्यांच्या स्वाक्षर्यांचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून ६० लाख स्वाक्षर्या जमा झाल्या आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळणे आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात मंत्र्यांची समिती गठीत करण्यात येणार आहे. यामध्ये व्यापार्यांनी शेतमालाला आधारभूत मूल्य दिले नाही, तर त्यांच्यावर खटला नोंदवण्याची तरतूद करण्यात येणार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.