राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ‘लव्ह जिहाद’च्या हिंदुविरोधी षड्यंत्राला ‘आंतरधर्मीय विवाह’ ठरवण्याचा प्रयत्न !

सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जितेंद्र आव्हाड निरुत्तर ! अजित पवार यांनी वादविवाद थांबवण्याचे आवाहन केले.

उद्योजक सदानंद कदम ‘ईडी’च्या कह्यात !

‘साई रिसॉर्ट’वर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. या कारवाईचा मी निषेध करतो. कोकणातील पर्यटन उद्ध्वस्त करण्याचे पाप हे सरकार करत आहे – माजी आमदार संजय कदम

औरंगजेबाचे फलक फडकवणार्‍यांवर कारवाई करणार ! – मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप

औरंगजेबाचे उघडपणे होत असलेले उदात्तीकरण न दिसणारे पोलीस आंधळे आणि बहिरे आहेत का ? अशा कर्तव्‍यचुकार पोलिसांवरही तात्‍काळ कठोर कारवाई केली पाहिजे !

खेड येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेविषयी शिवसेना नेते रामदास कदम यांचे उद्गार !

उद्धव ठाकरे यांनी आमचा धसका घेतला आहे. त्यामुळे खेडमध्ये बाहेरची माणसे आणून विराट सभेचा दिखावा केला जात आहे. त्याच मैदानात सभा आम्ही १९ मार्चला घेणार असून या सभेला व्याजासहित उत्तर देऊ.

बंडखोरीमुळे लोकशाही जिवंत रहाणार कि नाही ?, असा प्रश्‍न उभा राहिला ! – भास्कर जाधव

आताचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत सगळीकडे ही कामे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात झाली आहेत, असे खोटेच सांगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनांसाठी एकही पैसा दिलेला नाही.

शिवसेना नाव चोरले; मात्र पक्ष चोरू शकत नाही ! – उद्धव ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेड येथील गोळीबार मैदानात सार्वजनिक सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.

खासदार संजय राऊत यांच्या हक्कभंगावरून विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

विधीमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्याविषयी भाजपने संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभेत केलेल्या हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे. याविषयी २ दिवसांत चौकशी सभागृहात निर्णय देऊ, अशी घोषणा अध्यक्षांनी केली.

संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी सत्ताधार्‍यांचा गदारोळ !

संजय राऊत सत्ताधार्‍यांविषयी म्हणाले, ही बनावट शिवसेना आहे. डुप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नव्हे, हे चोरमंडळ आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निर्णय आमच्‍या बाजूने न लागल्‍यास रक्‍तपात होईल ! – शरद कोळी, ठाकरे गटाचे नेते

शरद कोळी म्‍हणाले की, आमचा आणि जनता यांचा कायद्यावरील विश्‍वास उडाला आहे. कायदा पंतप्रधान नरेंद्री मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे, अशी घणाघाती टीका त्‍यांनी केली.

शिवसेना पक्षचिन्ह आणि कायदा-सुव्यवस्था विषयांवरून अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे !

खासदार संजय राऊत यांना ठार मारण्याची सुपारी देण्याचा विषय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पोलीस चौकीत मारहाण आणि त्यात त्याचा मृत्यू, तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.