सिंहगडावर (पुणे) जाण्यासाठी उपद्रव शुल्क रोख स्वरूपात भरण्याची सक्ती !

कोंढणपूर फाट्याजवळ भ्रमणभाषला ‘नेटवर्क’ची समस्या आहे. तरीही ‘ऑनलाईन पेमेंट’ सुविधा उपलब्ध करण्यास काही अडचण नाही. पुढील १० दिवसांमध्ये याविषयी कार्यवाही करू.

#Exclusive: गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई पावसाळ्यानंतर चालू करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

राज्यातील गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भातील सरकारच्या भूमिकेविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत घेऊन याविषयीचे धोरण जाणून घेतले.

विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणावर घाव घालण्याची हीच वेळ ! – नितीन शिंदे, माजी आमदार

आता ‘विशाळगड मुक्ती आंदोलना’च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणावर घाव घालण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केले.

गड-दुर्गांचे पावित्र्य जपण्यासाठी धुडगूस घालणार्‍या पर्यटकांना चेतावणी देणार्‍या सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांचे अभिनंदन !

गड–दुर्ग ही पर्यटन स्थळे नव्हेत, तर क्षात्रवीरांची तीर्थस्थळे आहेत, हे लक्षात घ्या. गडांचे पावित्र्य राखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना चेतावणी द्यावी लागते , हे प्रशासनाला लज्जास्पद !

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणाविषयी विस्तृतपणे चर्चा करू ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

समितीच्या वतीने श्री. ठाकरे यांना ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. ‘हलाल अर्थव्यवस्थेविषयी आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे त्यांनी सांगितले.

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ७७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारची अनुमती !

या निधीतून गड-दुर्ग पर्यटन आणि तीर्थस्थळे, सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक,शिवसृष्टी, वढु बुद्रुक येथील स्मारका, अष्टविनायक, श्री क्षेत्र जेजुरी यांचा विकास होणार असून वनपर्यटनाला चालना देण्यासाठी बिबटे सफारी चालू करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षात गड अतिक्रमणमुक्त ?

गड-दुर्गांच्या संवर्धनाची घोषणा राज्य सरकारने केली आहे; मात्र त्यांचा इतिहास भावी पिढीपुढे आणण्यासाठी पुरातत्व विभाग आणि सरकार यांनी एकत्रित प्रयत्न करणे अपेक्षित आहे. गड-दुर्गांचे संवर्धन हा केवळ राजकीय लाभापुरता विषय मर्यादित न ठेवता त्याविषयी आत्मियतेने काम करणे आवश्यक आहे.

यावल (जिल्हा जळगाव) येथील पुरातन गडाची दुरुस्ती आणि संवर्धन यांसाठी जिल्हाधिकार्‍यांची बैठक !

यावलचा हा गड ३५० वर्षांपूर्वीचा आहे. त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या गडाच्या भिंतींना तडे गेलेले असून काही ठिकाणी झाडे उगवलेली आहेत, तर गडावर सुद्धा अशीच झाडे आहेत.

सनातन संस्थेच्या वतीने रत्नागिरी, लांजा, सावर्डे, चिपळूण आणि दापोली येथे  ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

प्रत्येक मानवाला त्याच्या यथोचित योग्यतेनुसार जीवन जगात आले पाहिजे यासाठी हिंदु राष्ट्र आणि समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र संकल्पनेचा उद्घोष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच करू शकतात.

रांजणा डोंगरावरील ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित !

बाळा डामसे या तरुणाने पर्यटन आणि गिर्यारोहण वाढावे, यासाठी रांजणा डोंगर शिखराच्‍या खाली असलेल्‍या पाण्‍याच्‍या दोन टाक्‍या स्‍वच्‍छ केल्‍या आहेत. तसेच पर्यटक आणि गिर्यारोहकांना मार्गदर्शन करण्‍याचे काम ते करतात.