संपूर्ण जगाला तारणार्‍या हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक ! – प्रा. विनायक (श्याम) देशपांडे, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती, वर्धा

जेव्हा हिंदु धर्म संकटात येतो, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागतो. त्यामुळे जग टिकून रहायचे असेल, तर हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. विनायक (श्याम) देशपांडे यांनी वर्धा येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.

भारत पुन्हा विश्वगुरु झाला पाहिजे ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

गुरूंनी सांगितलेले नाम, साधना, सेवा केली, तर आपली आणि समाजाची उन्नती होईल. अशा सात्त्विक समाजामुळे भारताला विश्वगुरु बनवणे शक्य होईल, असे मार्गदर्शन श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनी केले.

गुरुपौर्णिमेच्या कालावधीत जालगाव (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर यांच्या घरी झालेले विविध त्रास

गुरुपौर्णिमेच्या कालवधीत जालगाव, दापोली येथील श्री. शांताराम मांडवकर यांच्या घरी वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे झालेले विविध त्रास येथे दिले आहेत.

देवभक्तिहून श्रेष्ठ असलेल्या गुरुभक्तीची महती सांगणारा पुणे येथील सनातनचा भक्तिमय गुरुपौर्णिमा महोत्सव !

संतांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यात ७ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा ! या महोत्सवांचे संक्षिप्त वृत्त प्रस्तुत करीत आहोत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात ४ ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी !

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात खोपोली, जांभूळपाडा, पेण आणि अलीबाग अशा ४ ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ६ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी !

जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली आणि बदलापूर येथे एकूण ६ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यांचा लाभ ७२५ हून अधिक साधक आणि जिज्ञासू यांनी घेतला.

शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करतांना शिक्षकांनी गुरूंचे महत्त्व मुलांना सांगणे अपेक्षित !

मातेला मान देण्याला महत्त्व आहे, याविषयी शंका नाही; परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता आणि गुरु यांच्या भूमिकेत गल्लत करू नये.

सध्याच्या काळात हिदूंना संघटित करून दबावतंत्राचा वापर केला पाहिजे ! – भगवंत जांभळे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, मनसे

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी हिंदूंनी पीडित हिंदु तरुणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून रोखठोक भूमिका घेतली पाहिजे, तसेच हिंदूंना संघटित करून त्याद्वारे दबावतंत्राचा वापर केला पाहिजे, असे परखड मत मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंत जांभळे यांनी येथे व्यक्त केले.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अधिकाधिक साधना करण्याचा संकल्प करूया ! – डॉ. (सौ.) सायली यादव, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

सर्वोच्च आनंद केवळ साधना करूनच मिळू शकतो. यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अधिकाधिक साधना करण्याचा संकल्प करा, असे आवाहन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या डॉ. (सौ.) सायली यादव यांनी केले.

आनंदप्राप्ती आणि रामराज्याची स्थापना यांसाठी साधना !

रामराज्य येण्यापूर्वी  रावणवध होणे विधीलिखित होते. रावणवधानंतरच रामराज्याची स्थापना झाली. आताही रामराज्यरूपी हिंदु राष्ट्र येण्यापूर्वी आपत्काळ येणे अटळ आहे, किंबहुना त्याचा आरंभही झाला आहे.