सद्गुरुचरणी नित्य वास असावा ।
श्री सद्गुरूंची छबी सदैव मी पहातो । अश्रूंची फुले मी नित्य वहातो ॥
सद्गुरुचरणी नित्य वास असावा । त्यांचेच पदी मोक्ष मिळावा ॥
श्री सद्गुरूंची छबी सदैव मी पहातो । अश्रूंची फुले मी नित्य वहातो ॥
सद्गुरुचरणी नित्य वास असावा । त्यांचेच पदी मोक्ष मिळावा ॥
‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विष्णुभक्ती करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळालेली अमूल्य संधी म्हणजे ‘वैकुंठचतुर्दशी !’ वैकुंठचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार खुले असते. जो भक्त या दिवशी थोडीशीही विष्णुभक्ती करतो, त्याच्यासाठी वैकुंठधामात स्थान मिळणे सुनिश्चित आहे.
‘एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पू. पात्रीकरकाकांनी विचारले, ‘‘गुरुस्मरण होते का ?’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्व देवतांचे संस्कृत भाषेत ध्यानाचे श्लोक असतात, तसेच गुरुदेवांचेही असायला हवेत.’ त्यानंतर देवानेच मला पुढील श्लोक सुचवले.
पहिल्या भागात ‘तणावपूर्ण जीवनात मनःशांतीचा शोध’ या विषयावरील ‘वेबिनार’च्या आयोजिकेला जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती पहिल्या, आज पुढील भाग पाहूया . . .
‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.
आज कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी, पू. (श्रीमती) माया गोखलेआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .
‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आज कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी या दिवशी कु. ईश्वरीचा ५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्यावर आईने ‘सुसंस्कार होण्यासाठी कसे प्रयत्न केले ?’, हे येथे दिले आहे.
त्या इवल्याशा रोपाचा वटवृक्ष होऊनी पसरला जगांतरी ।
वटवृक्ष बहरला चैतन्याच्या फुलांनी ।
त्याचा परिमल दरवळला त्रिभुवनी ॥