अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारे तेज म्हणजे सद्गुरु !

जसे सूर्याचे कार्य असते, तसेच सद्गुरूंचे कार्य असते. सद्गुरु अज्ञानरुपी अंधाराचा नाश करतात. दृश्य काळोखापेक्षा, अज्ञानाचा काळोख प्रचंड असतो.

सनातन सांगत असलेल्या साधनेची फलनिष्पत्ती !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार सहस्रो जिज्ञासू प्रतिदिन साधना करत आहेत. ‘सनातन सांगत असलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गामुळे गेल्या २५ वर्षांत १२७ साधक संतपदाला पोचले आहेत आणि सहस्रो साधक त्या दिशेने वाटचाल करत आहेत.

सनातनची ग्रंथमालिका ‘गुरुकृपायोगानुसार साधना’

शीघ्र गुरुप्राप्ती आणि अखंड गुरुकृपा यांसाठी काय करावे, हे जाणून घ्या !

श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्सेवेतच खरा आनंद असल्याचे शिकवणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सर्वत्रच्या साधकांना भगवद्गीतेप्रमाणे ‘गुरुकृपायोग’ सांगून साधकांचा उद्धार केला आहे, तरीही ते सत्सेवेतील आनंद घेण्यासाठी साधकांच्या प्रत्येक अडीअडचणीत स्थूल, तसेच सूक्ष्म रूपात धावून येऊन साहाय्य करतात.

सनातनच्‍या ग्रंथमालिका : ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा साधनाप्रवास’

प.पू. भक्‍तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांना ‘शिष्‍य’ म्‍हणून स्‍वीकारल्‍यावर अल्‍पावधीतच त्‍यांना ‘आपणासारिखे’ केले ! या साधनाप्रवासात डॉ. आठवले यांनी स्‍वतःच्‍या आंतरिक अवस्‍थांतील पालट, स्‍वतःच्‍या आध्‍यात्मिक उन्‍नतीचे मोजमापन इत्‍यादी नोंद करून ठेवले, तसेच याविषयी पुढे सनातनच्‍या ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांकडून जाणूनही घेतले.

गुरुपौर्णिमेला ६ दिवस शिल्‍लक

श्री शंकराचार्यांनी  म्‍हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणार्‍या सद़्‍गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही  नाही. त्‍यांना परिसाची उपमा दिली, तरी तीही अपुरी पडेल; कारण परीस लोखंडास सुवर्णत्‍व देत असला, तरीही त्‍याचे परीसत्‍व देऊ शकत नाही.’’  

गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्‍लक

संन्‍याशांना ज्ञानयोगाने वैराग्‍य येते. काही जण वैराग्‍य पराकोटीला गेले की, संन्‍यास घेतात आणि घरदार सोडून फिरतात; मात्र हा संन्‍यास गुरूंनी दिला असेल, तरच घरदार सोडून गेल्‍याचा फायदा होतो. गुरूंशिवाय संन्‍यास घेऊन गेल्‍यास काही जण हिमालयात थंडीने किंवा इतरत्र उपासमारीने मरतातसुद्धा.

गुरुपौर्णिमेला ९ दिवस शिल्‍लक

ईश्‍वराचे मारक रूप काही शिकवण्‍यासाठी रागावले, तर त्‍याच वेळी ईश्‍वराचे तारक रूप म्‍हणजेच गुरु भक्‍ताला सांभाळून घेतात; परंतु गुरु म्‍हणजे तारक रूपच रागावले, तर त्‍यांची क्षमा मागण्‍यावाचून दुसरा मार्ग नसतो.

गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक

कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.